शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
5
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
6
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
7
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
8
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
9
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
10
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
11
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
12
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
13
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
14
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
15
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
16
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
17
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
18
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
19
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
20
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

बँकांना कारवाईच्या धमक्या देऊन शेतकऱ्यांची चेष्टा : राजन पाटील यांची भाजप सरकारवर टिका

By admin | Updated: June 24, 2017 12:25 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : बँकांची आर्थिक अडचण न पाहताच सत्ताधाऱ्यांकडून पीक कर्ज देण्याच्या मुद्यावरुन सातत्याने कारवाईच्या धमक्या देत असून, त्यांना शेतकऱ्यांना कर्जाच्या माध्यमातून मदत मिळावी असे वाटत नाही असा आरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केला आहे.राज्यात सध्या पीककर्ज माफीचा विषय ऐरणीवर असून जाहीर केलेल्या कर्जमाफीवरुन वादंग सुरू असतानाच नव्याने कर्ज वाटपाचाही मुद्दा सतत चर्चेत आहे. शासन सरसकट कर्जमाफी करणार की लाखापर्यंतचे?, किंवा अन्य निकष लावणार?, हे आजही नक्की नाही. अशातच कर्जमाफी होणाऱ्या किंवा सध्या कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना नव्याने १० हजार रुपयांप्रमाणे कर्ज देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत; मात्र सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसेच नसल्याने नव्याने कर्ज न देण्यावर बँक ठाम आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे रोखता व तरलता(सी.आर. आर. व एस.एल. आर.) राखण्यासाठी आम्हालाच पैशाची गरज असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले. शासनस्तरावरुन पीक कर्जाबाबत दररोज वेगवेगळे आदेश निघत असून, नियम व निकषामुळे कर्ज कोणाला द्यायचे हा बँकांपुढील प्रश्न असल्याचे पाटील म्हणाले. महसूलमंत्र्यांनी आता राज्य बँकेची मदत घ्यावी असे म्हटले आहे, आम्ही ५० कोटींची मागणी केली असून ती मिळेल का नाही?, कधी मिळणार?, हे माहिती नाही; मात्र शासनाचे सध्याचे धोरण पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे असे शासनालाच वाटत नाही असा आरोप पाटील यांनी केला. ------------------------राज्य बँकेतील ठेवीतून पैसे द्याएस.एल.आर. राखण्यासाठी जिल्हा बँकेला ३८७ कोटी २३ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक असून बँकेने आतापर्यंत २५१ कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेकडे पैसे नसल्याने १३५ कोटी ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली नाही.- १३५ कोटी ७५ लाख रुपयावर बँकेला १४.५ टक्के व्याज भरावे लागते आहे.सी.आर.आर. राखण्यासाठी ७५ कोटी ५६ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक असताना बँकेने १४६ कोटी २६ लाख गुंतविले आहेत. सी.आर.आर. मध्ये अधिक ६८ कोटींची गुंतवणूक आहे.- राज्य बँकेत आमच्या ३५० कोटींच्या ठेवी असून यापैकी काही रक्कम परत मिळाली तर ही रक्कम एस.एल.आर.मध्ये गुंतवून व्याज वाचवू.- रद्द झालेल्या १०२ कोटींच्या नोटा आठ महिने न स्वीकारल्याने बँकेचे नुकसान झाले. खातेदाराला चार टक्के व्याज द्यावे लागले तर ही रक्कम शेतकऱ्यांना वाटता न आल्याने व्याजावर पाणी सोडावे लागले.----------------रद्द केलेल्या नोटा स्वीकारत नाहीत, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पैसे देत नाहीत, दुष्काळी मदतही दीड वर्षापासून दिली नाही. ही परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ होईल यावर विश्वास नाही.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँक