शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

शेतकरी संघटना संतापली.. आंदोलकांनी जलसंपदा मंत्र्यांचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST

भीमानगर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी योजना रद्द करुन तोंडी आश्वासन दिले. आज पाच दिवस ...

भीमानगर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी योजना रद्द करुन तोंडी आश्वासन दिले. आज पाच दिवस झाले तरीही लेखी स्वरूपात आदेश शासन काढत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.

उजनी धरण भीमानगर येथे गेटवर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाचा निषेध म्हणून सोमवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुतळा जाळल्यानंतर पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

शासन पाणी योजना रद्दचा आदेश जोपर्यंत लेखी काढत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येणार असल्याचे प्रभाकर भैया देशमुख व संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी सांगितले. यापुढील आंदोलनात अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल आबा मस्के,अमोल जगदाळे, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश उजगीरे, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक उपस्थित होते.

----

जवळपास एक महिना झाला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहे. उजनी धरणाच्या जिवावर जवळपास ३० कारखाने आहेत. सर्व कारखान्याना जो ऊस मिळतो तो उजनीच्या पाण्यामुळे परंतु अद्याप एकाही कारखान्याच्या चेअरमनने आंदोलनात भाग घेतला नाही अथवा पाठिंबा दिला नाही. यापुढे सर्व कारखान्यांच्या चेअरमनच्या घरांना टाळे ठोक आंदोलन केले जाईल. त्यांचाही निषेध करण्यात येणार आहे.

-

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना