शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटना संतापली.. आंदोलकांनी जलसंपदा मंत्र्यांचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST

भीमानगर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी योजना रद्द करुन तोंडी आश्वासन दिले. आज पाच दिवस ...

भीमानगर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी योजना रद्द करुन तोंडी आश्वासन दिले. आज पाच दिवस झाले तरीही लेखी स्वरूपात आदेश शासन काढत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.

उजनी धरण भीमानगर येथे गेटवर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाचा निषेध म्हणून सोमवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुतळा जाळल्यानंतर पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

शासन पाणी योजना रद्दचा आदेश जोपर्यंत लेखी काढत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येणार असल्याचे प्रभाकर भैया देशमुख व संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी सांगितले. यापुढील आंदोलनात अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल आबा मस्के,अमोल जगदाळे, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश उजगीरे, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक उपस्थित होते.

----

जवळपास एक महिना झाला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहे. उजनी धरणाच्या जिवावर जवळपास ३० कारखाने आहेत. सर्व कारखान्याना जो ऊस मिळतो तो उजनीच्या पाण्यामुळे परंतु अद्याप एकाही कारखान्याच्या चेअरमनने आंदोलनात भाग घेतला नाही अथवा पाठिंबा दिला नाही. यापुढे सर्व कारखान्यांच्या चेअरमनच्या घरांना टाळे ठोक आंदोलन केले जाईल. त्यांचाही निषेध करण्यात येणार आहे.

-

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना