शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर जागृत झाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:24 IST

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोन दिवसीय अधिवेशनास शनिवारी सांगोल्यात सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये शेकाप आमदार जयंत ...

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोन दिवसीय अधिवेशनास शनिवारी सांगोल्यात सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये शेकाप आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार बाळाराम पाटील, राजेंद्र कोरडे, माजी आमदार संपतराव पाटील, चंद्रकांत देशमुख, चिटणीस विठ्ठलराव शिंदे, बाळासाहेब काटकर, पं.स. सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, ॲड. सचिन देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, बाबासाहेब करांडे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, मारुती बनकर, खरेदी-विक्री संघाचे पी.डी. जाधव, सभापती गिरीश गंगथडे आदी उपस्थित होते.

चिटणीस जयंत पाटील यांनी स्व. माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानिमित्त ठराव मांडल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ. जयंत पाटील यांनी गेल्या महिन्यापासून शेकाप पक्षाला सक्रिय करून पक्ष संघटनेमध्ये तरुणांचा सहभाग वाढविला आहे. डाव्या पक्षांचे मूल्यमापन करताना अनेक विचारवंतांनी पुस्तके लिहिली आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा जन्म खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून झाला आहे, असे एस. व्ही. जाधव यांनी सांगितले.

या दोन दिवसाच्या अधिवेशनासाठी अलिबाग, पेण, पनवेल, तुळजापूर, लातूर, सांगली, नाशिक, जळगाव, पुणे, कर्जत, पाली, रोहा, अकोला, कोल्हापूर, अमरावती, इगतपुरी, शेगाव, परभणी, पैठण, पिंपरी चिंचवड, मुखेड या भागातून शेतकरी कामगार पक्षाचे २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत देशमुख यांनी आभार मानले.