शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सीनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पुलावर मारला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST

दक्षिण सोलापूर : उजनी धरणातून सीना नदीत सोडलेले पाणी अद्यापपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वडकबाळ पुलावर अचानक ...

दक्षिण सोलापूर : उजनी धरणातून सीना नदीत सोडलेले पाणी अद्यापपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वडकबाळ पुलावर अचानक ठिय्या दिला. टेल टू हेड बंधारे भरून देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी लावून धरली.

सीना नदीला पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या महिन्यापासून कोरडी पडलेली सीना नदीतील बंधारे भरण्याची मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली होती. अधिकारी पाणी सोडल्याचे सांगत आहेत; पण पाणी दक्षिण तालुक्यापर्यंत अद्याप तरी पोहोचले नाही. पिके वाळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी अचानक वडकबाळ पुलावर ठिय्या दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान सुमारे अर्धा तास सोलापूर-विजयपूर महामार्गावरची वाहतूक रोखली होती.

मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. भीमा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणला. त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात विलास लोकरे, वडकबाळचे सरपंच सद्दाम शेख, माजी सरपंच मलकारी पुजारी, सुरेश पुजारी, सुनील व्हनमाने, तिपन्ना पुजारी, पप्पू पुजारी, अमोगसिद्ध पुजारी, नागनाथ पुजारी, हतूरचे रमेश पाटील, ज्योत्याप्पा पुजारी यांच्यासह ५०-६० शेतकरी सहभागी झाले होते.

----

चार दिवसांत पोहोचेल पाणी

आजच सकाळी मोहोळ शाखा कालव्यातून १५० क्यूसेकने सीना नदीत पाणी सोडले जात आहे. नदी कोरडी असल्याने पात्रातील खड्डे भरत, अडथळे पार करीत पाण्याचा प्रवास होणार आहे. दुपारी पाणी अर्जुनसोड बंधाऱ्यात आले आहे. मार्गातील ६ को. प. बंधारे भरून वडकबाळपर्यंत पाणी येण्यासाठी आणखी किमान चार दिवस लागतील. कोर्सेगाव बंधाऱ्यात सहा दिवसांनी पाणी स पोहोचेल, अशी माहिती भीमा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी दिली.

-------

महिनाभरापासून सीना नदी कोरडी पडल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. नेहमीच ‘टेल टू हेड’ हा नियम डावलला जातोय. चार दिवसांत पाणी आले नाही तर १ मे रोजी तीव्र आंदोलन करणार आहोत.

- अप्पाराव कोरे, माजी सभापती जिल्हा परिषद