शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांना टोलमाफी करा, अन्यथा आजपासून प्रहारचे तोडफोड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते आणि राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० ...

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते आणि राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० हा नवीन रस्ता करण्यात आला आहे. २० सप्टेंबर, २०२१ पासून या मार्गावरून प्रवास करण्याकरिता आता वाहनधारकांना टोल भरावे लागणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे, परंतु या टोल नाका परिसरातील १५ ते २० किलोमीटरपर्यंतच्या वाहनधारकांना टोलमाफी करावी. हा राष्ट्रीय महामार्ग होताना, ज्यांच्या जमिनी, शेती यामध्ये गेल्या आहेत, त्यांना प्रथम प्राधान्याने सवलत मिळावी. स्थानिक रहिवाशांना, तसेच प्रकल्पग्रस्तांना टोल नाक्यावर काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी दक्षिण सोलापूर प्रहार जनशक्ती संघटनेने केली आहे.

स्थानिक रहिवाशांना टोलमाफी द्यावी, त्वरित टोल आकारणी थांबवा, अन्यथा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, २२ सप्टेंबर रोजी तोडफोड आंदोलन आंदोलन करणार असल्याचा इशारा दक्षिण सोलापूर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी दिला आहे.

सोलापूर अक्कलकोट हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला आहे. यामध्ये काही दुमत नाही, परंतु येथील स्थानिक रहिवाशांना आपल्या विविध कामांसाठी दिवसातून चार-ते पाच वेळा सोलापूर, अक्कलकोटसाठी जावे लागते. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून टोल घेण्यात येतो, परंतु हे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. सोलापूर-अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर अजून कामे सुरू आहेत. काम हे पूर्णपणे झाले नाही, तरीही टोल आकारण्यात येत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे १०० ते १५० लोकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत. काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. याला जबाबदार कोण? त्यांना नुकसान भरपाई मिळणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे. अगोदर सर्व कामे मार्गी लावा, मगच टोल आकारणी करा, अशी मागणी केली.

---

या टोल नाका परिसरातील १५ ते २० किलोमीटर अंतरातील गावातील नागरिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळालेच पाहिजे, अन्यथा या पुढील काळात प्रहार संघटना तोडफोड आंदोलन करेल. वेळप्रसंगी टोल प्लाझा बंद पाडू.

- मोहसिन तांबोळी, प्रहार संघटना अध्यक्ष, ता.दक्षिण सोलापूर.