शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळेना.. बळीराजाचा कृषी कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

या आंदोलनामध्ये प्रवीण क्षीरसागर, आनंद यादव, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, महेश मोटे, इंदुमती बोकेफोडे, ऋषिकेश भोसले, सतीश शिंदे ...

या आंदोलनामध्ये प्रवीण क्षीरसागर, आनंद यादव, शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले, महेश मोटे, इंदुमती बोकेफोडे, ऋषिकेश भोसले, सतीश शिंदे यांच्यासह शंभर ते दीडशे शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी शहाजी कदम, कृषी सहायक गणेश पाटील, भारती अक्सा कंपनीच्या प्रतिनिधीस शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिले.

या निवेदनात तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी खरीप पिकांच्या नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचे म्हटले आहे. तसेच अतिवृष्टीनंतर ७२ तासात ऑनलाईन किंवा ऑफलाईन नुकसानीची माहिती द्यावी असे विमा कंपनीने म्हटले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील रस्ते वाहून गेले, विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे मोबाइल व दूरध्वनीवरून संपर्क साधणे अशक्य होते त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाईचे अर्ज करता आले नाहीत. कंपनीचे विमा प्रतिनिधी अनेक गावात आलेच नाहीत. शेतकऱ्यांनी अनेकवेळा अर्ज देऊन ही पोच देण्यास नकार दिला.

----भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु....

यावेळी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने गणेश पाटील यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करून आजपर्यंत २६,५०० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे. उर्वरित ३,५०० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. २८ डिसेंबरपासून कृषी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेमध्ये भारती अक्सा कंपनीचे विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

----

-----