शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

परीक्षा जाहीर केली... अर्ज भरले... तयारी केली अन्‌ आता सांगताहेत घेता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST

सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने आता प्रवेश प्रक्रिया कशी होणार, याची ...

सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने आता प्रवेश प्रक्रिया कशी होणार, याची चिंता विद्यार्थी व पालकांना लागली आहे. आता दहावीच्या गुणांवरच प्रवेश मिळणार असल्याने मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याचीच चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार सीईटीसाठी ऑनलाइन अर्जही मागण्यात आले. विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारीही सुरू केली होती. मात्र, न्यायालयाने सीईटी परीक्षा घेता येणार नसल्याचे सांगून अकरावीच्या गुणांवरच प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत निर्देश दिले. दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आता राज्य शासनाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी काय निर्देश येतील, याची प्रतीक्षा लागली आहे. आपल्याला पाहिजे असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

---

विद्यार्थी स्थिती

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : ६८०१८

अकरावीची प्रवेश क्षमता : ७६७३६

शाखानिहाय जागा : कला : ३६१७१

विज्ञान : २९२३७

वाणिज्य : ११३२८

००००००००

आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची

सीईटी रद्द झाल्याने आता दहावीच्या गुणांवरच मेरिट लिस्ट लागणार आहे. नववीमध्ये काही विद्यार्थी खेळाकडे लक्ष दिल्याने त्यांना परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाकडून काय निर्देश येतील, त्यावर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

-वासंती आयर, प्राचार्य, सोनी कॉलेज

सीईटी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती. सीईटी कोणत्या अभ्यासक्रमावर होणार आहे. हेही विद्यार्थ्यांना माहीत नव्हते. आता सीईटी रद्द झाल्याने थेट मेरिटनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून नियमावली येणार आहे. त्यानुसारच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

-प्रवीण देशपांडे, प्राचार्य, आयएमएस ज्युनिअर कॉलेज

०००००००००

विद्यार्थी चिंतेत

सीईटी परीक्षा व्हायला हवी होती. दहावी अभ्यासक्रमावरच ती परीक्षा होणार होती. त्यानुसार अभ्यास केला होता. सीईटीमुळे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाला असता. नववीत गुण कमी असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसार होणार आहे. आता मिळेल, त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

-भूमिका मकाई, विद्यार्थी

सीईटी परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्यायच होणार आहे. आता जिथे प्रवेश घ्यायचा आहे. तिथे प्रवेश मिळणे अशक्य आहे. सीईटी परीक्षा झाली असती, तर मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणे शक्य झाले असते.

-ऋचा शिंदे, विद्यार्थी