शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गोरगरिबांना मोफत धान्य मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:19 IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ ...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचे १३ एप्रिलला जाहीर केले. त्यानंतर १५ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले.

त्यामुळे सरकारने मोफत जाहीर केलेले धान्य घेण्यासाठी सांगोला तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप दुकानांकडे धाव घेतली. मात्र, दुकानदारांकडून अद्याप आम्हाला मोफत धान्य वाटपासंदर्भात आदेश आले नाहीत, धान्याचा कोटा आला नाही. धान्य कधी येईल असे दुकानदारांना विचारल्यास धान्य आल्यावर कळविण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

यावर तहसीलदारांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून

लॉकडाऊन काळात गोरगरीब लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मोफत धान्याचा पुरवठा करायला हवा होता. मात्र, तहसीलदारांचे धान्य वाटपाकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळण्यासाठी मे उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे.

कोट ::::::::::::::::::

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत धान्य वाटपाचा आदेश प्राप्त झाला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी मे महिन्यात केली जाईल. कारण जिल्हा पुरवठा विभागाकडून तसा अद्याप कोटा प्राप्त झाला नाही.

- अभिजित पाटील, तहसीलदार सांगोला