शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

२१ वर्षांनंतरही उजनीच्या २ टीएमसी पाण्यापासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST

सांगोला : युती सरकारच्या काळात उजनीतून मंजूर झालेले २ टीएमसी उचल पाण्याचे भूमिपूजन झाले खरे, मात्र २१ वर्षांनंतरही सांगोल्याला ...

सांगोला : युती सरकारच्या काळात उजनीतून मंजूर झालेले २ टीएमसी उचल पाण्याचे भूमिपूजन झाले खरे, मात्र २१ वर्षांनंतरही सांगोल्याला पाणी मिळालेच नाही. काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेनेचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री झाले. मात्र, उजनीतून सांगोल्याच्या उचल पाण्यासाठी निधीची तरतूद केलीच नाही. २१ वर्षांपासून निधीअभावी योजनाच रखडल्याने उजनीचे उचल पाणी सांगोल्यासाठी मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी चर्चा आता शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिवंगत मंत्री महादेव शिवणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून उजनीतून दोन टीएमसी उचल पाणी योजना मंजूर करुन घेतली होती. त्यांच्या कालावधीत विधानसभा बरखास्त झाली. दरम्यान, २००० साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व तत्कालीन लोकप्रतिनिधी गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीत उजनीच्या उचल पाण्याचे साळमुख (माळशिरस) याठिकाणी भूमिपूजन झाले.

त्यानंतर गणपतराव देशमुख तब्बल तीनवेळा विधानसभेत निवडून गेले. त्यांच्या कालावधीत म्हणजेच २१ वर्षांत या योजनेला १ रूपयाही आर्थिक मदत न मिळाल्याने ही योजना अद्याप कागदावरच आहे. दरम्यान, २०१३ साली या योजनेसाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात १० कोटींची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात तरतूद केलीच नाही. त्यामुळे गेल्या २१ वर्षांत ही योजना निधीअभावी रखडली व योजनेतील लाभार्थी आजपावेतो पाणी... पाणी... करत आहेत.

२१ वर्षांत मिळाली केवळ आश्वासने

मागील २१ वर्षांच्या काळात सांगोला तालुक्यात पाण्यासाठी अनेकदा पाणी परिषदा, रस्ता रोको आंदोलने झाली. मात्र, उजनीच्या उचल पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाच नाही. महाराष्ट्रातील आजी-माजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री सांगोल्यात येऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्न व टेंभू-म्हैसाळ, उजनी उचल पाणी योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, म्हणून आश्वासने देऊन गेले. मात्र, मुंबईत गेल्यावर त्यांना घोषणांचा विसर पडला. साधे फाईलकडे पाहण्यासाठीही वेळ मिळाला नाही.

उजनीच्या पाण्यावरून राजकारण तापलेलेच

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांडपाण्याच्या नावाखाली उजनीतून ५ टीएमसी पाणी मंजूर करून घेतले. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना सांगोल्याच्या मंजूर दोन टीएमसी पाण्याचे काय झाले, अशी चर्चा सध्या सांगोल्यात शेतकऱ्यांमधून सुरू आहे. ही योजना मंजूर होऊनही आजपर्यंत मार्गी लागली नाही. त्यामुळे तत्कालीन नेतृत्व कमी पडले की? सरकारची उदासिनता याचे कोडे अद्याप सुटलेले नाही.

फोटो ओळ :::::::::::::::::::

२१ वर्षांपूर्वी साळमुख येथे झालेल्या उजनी उचल पाण्याच्या भूमिपूजन कोनशिलेचे छायाचित्र.