शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

२१ वर्षांनंतरही उजनीच्या २ टीएमसी पाण्यापासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST

सांगोला : युती सरकारच्या काळात उजनीतून मंजूर झालेले २ टीएमसी उचल पाण्याचे भूमिपूजन झाले खरे, मात्र २१ वर्षांनंतरही सांगोल्याला ...

सांगोला : युती सरकारच्या काळात उजनीतून मंजूर झालेले २ टीएमसी उचल पाण्याचे भूमिपूजन झाले खरे, मात्र २१ वर्षांनंतरही सांगोल्याला पाणी मिळालेच नाही. काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेनेचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री झाले. मात्र, उजनीतून सांगोल्याच्या उचल पाण्यासाठी निधीची तरतूद केलीच नाही. २१ वर्षांपासून निधीअभावी योजनाच रखडल्याने उजनीचे उचल पाणी सांगोल्यासाठी मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी चर्चा आता शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिवंगत मंत्री महादेव शिवणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून उजनीतून दोन टीएमसी उचल पाणी योजना मंजूर करुन घेतली होती. त्यांच्या कालावधीत विधानसभा बरखास्त झाली. दरम्यान, २००० साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व तत्कालीन लोकप्रतिनिधी गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीत उजनीच्या उचल पाण्याचे साळमुख (माळशिरस) याठिकाणी भूमिपूजन झाले.

त्यानंतर गणपतराव देशमुख तब्बल तीनवेळा विधानसभेत निवडून गेले. त्यांच्या कालावधीत म्हणजेच २१ वर्षांत या योजनेला १ रूपयाही आर्थिक मदत न मिळाल्याने ही योजना अद्याप कागदावरच आहे. दरम्यान, २०१३ साली या योजनेसाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात १० कोटींची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात तरतूद केलीच नाही. त्यामुळे गेल्या २१ वर्षांत ही योजना निधीअभावी रखडली व योजनेतील लाभार्थी आजपावेतो पाणी... पाणी... करत आहेत.

२१ वर्षांत मिळाली केवळ आश्वासने

मागील २१ वर्षांच्या काळात सांगोला तालुक्यात पाण्यासाठी अनेकदा पाणी परिषदा, रस्ता रोको आंदोलने झाली. मात्र, उजनीच्या उचल पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाच नाही. महाराष्ट्रातील आजी-माजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री सांगोल्यात येऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्न व टेंभू-म्हैसाळ, उजनी उचल पाणी योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, म्हणून आश्वासने देऊन गेले. मात्र, मुंबईत गेल्यावर त्यांना घोषणांचा विसर पडला. साधे फाईलकडे पाहण्यासाठीही वेळ मिळाला नाही.

उजनीच्या पाण्यावरून राजकारण तापलेलेच

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांडपाण्याच्या नावाखाली उजनीतून ५ टीएमसी पाणी मंजूर करून घेतले. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना सांगोल्याच्या मंजूर दोन टीएमसी पाण्याचे काय झाले, अशी चर्चा सध्या सांगोल्यात शेतकऱ्यांमधून सुरू आहे. ही योजना मंजूर होऊनही आजपर्यंत मार्गी लागली नाही. त्यामुळे तत्कालीन नेतृत्व कमी पडले की? सरकारची उदासिनता याचे कोडे अद्याप सुटलेले नाही.

फोटो ओळ :::::::::::::::::::

२१ वर्षांपूर्वी साळमुख येथे झालेल्या उजनी उचल पाण्याच्या भूमिपूजन कोनशिलेचे छायाचित्र.