कुर्डूवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जातीपातीच्या जिवलग मावळ्यांमुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते प्रा.बानगुडे पाटील यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रणित धर्मराज मित्र मंडळाच्या वतीने कुर्डूवाडी येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रारंभी छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ शुगर्सचे प्रा.शिवाजीराव सावंत हे होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संयोजक अरविंद पवार, नगरसेविका स्वाती पवार, संजय टोणपे, धनराज पवार यांनी केला.सुमारे ३ तास श्रोते हे व्याख्यान अगदी मन लावून ऐकत होते. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
जिवलग मावळ्यांमुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना नितीन बानगुडे-पाटील; शिवजयंतीनिमित्त व्याख्यान
By admin | Updated: May 9, 2014 23:52 IST