शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

पर्यावरणाचे रक्षण आवश्यक:मुख्यमंत्री

By admin | Updated: July 10, 2014 01:07 IST

समारोप: हवामानातील बदलांमुळे धोका

पंढरपूर: पर्यावरणातील बदलांमुळेच दुष्काळ, मोठ्या प्रमाणावर गारपीट, अतिवृष्टी आदी आपत्ती येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसामान्य माणसांपर्यंत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण दिंडी काढण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.पंढरपूर येथे ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सत्वशीला चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, आ. रामहरी रुपनवर, जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, कल्याणराव काळे आदी उपस्थित होते. पर्यावरणातील बदलांमुळे विश्वाचे उष्णतामान वाढत आहे. यावर नियंत्रण घातले पाहिजे. केंद्र्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पेट्रोलमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु याबरोबरच झाडे लावणे, पाणी वाचविणे महत्त्वाचे आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयामुळे मोठी समृध्दी झाली आहे. परंतु उजनीची पाणीपातळी पाहता यापुढे पाणी जपून वापरले पाहिजे. पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत शासनातर्फे सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी देण्यात आले, जनावरांसाठी मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध कलापथकांनी आपले पर्यावरणविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले. .