शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे रक्षण आवश्यक:मुख्यमंत्री

By admin | Updated: July 10, 2014 01:07 IST

समारोप: हवामानातील बदलांमुळे धोका

पंढरपूर: पर्यावरणातील बदलांमुळेच दुष्काळ, मोठ्या प्रमाणावर गारपीट, अतिवृष्टी आदी आपत्ती येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसामान्य माणसांपर्यंत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण दिंडी काढण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.पंढरपूर येथे ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सत्वशीला चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, आ. रामहरी रुपनवर, जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, कल्याणराव काळे आदी उपस्थित होते. पर्यावरणातील बदलांमुळे विश्वाचे उष्णतामान वाढत आहे. यावर नियंत्रण घातले पाहिजे. केंद्र्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पेट्रोलमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु याबरोबरच झाडे लावणे, पाणी वाचविणे महत्त्वाचे आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयामुळे मोठी समृध्दी झाली आहे. परंतु उजनीची पाणीपातळी पाहता यापुढे पाणी जपून वापरले पाहिजे. पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत शासनातर्फे सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी देण्यात आले, जनावरांसाठी मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध कलापथकांनी आपले पर्यावरणविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले. .