शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पांडुरंगाच्या दर्शनाला खुशाल जावा पण रस्त्याच्या उजव्या बाजूनं चाला

By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2023 19:11 IST

चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात.

सोलापूर : चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात. यंदा २८ मार्च ते ६ एप्रिल या काळात अनेक रस्त्यांवर हे चित्र दिसणार आहे. अंधाऱ्या रात्री अथवा दिवसा पाठिमागून येणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळेअपघात होतात. म्हणून उजव्या बाजूने चालावे, यासाठी आरटीओ प्रशासनाकडून पथकांद्वारे सोमवारपासून प्रबोधन मोहीम सुरु करण्यात आली.

चैत्री वारीसाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. बरेच वारकरी हे पंढरपूरकडे पायी चालत येत असतात. बऱ्याचदा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये भरधाव वाहने घुसून अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागलेला आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर व भल्या पहाटे वाहनचालकांना गर्दीचा अंदाज येत नाही. तसेच वारकऱ्यांनाही पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही.

यासाठी सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथक क्रमांक १ मधील मोटार वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे,शिरीष तांदळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय जाधव, विद्यादेवी जाधव, कार्यालयीन वाहन चालक शिवाजी गायकवाड यांना वाहनांची तपासणी करताना वारीतील सर्वच भाविक रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी जात असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी सर्व भाविकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याबाबत मार्गदर्शन केले.पाच वायुवेग पथकाची नियुक्ती

यासाठी जनजागरण मोहीम राबवण्यासाठी यापुढे वारकऱ्यांची यात्रा सुरक्षित व विना अपघात होण्यासाठी, जीवित हानी टाळण्यासाठी चैत्र वारी निमित्त उप प्रा परिवहन कार्यालयाच्या वतीने ५ वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या वायुवेग पथकामार्फत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तसेच संध्याकाळी अंधार पडल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठीचे प्रबोधन करण्यात येणार आहे.सर्व भाविकांना चैत्र वारी निमित्त रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठी पाच वायुवेग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून उजव्या बाजूने चाला याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी फूटपाथ नाहीत त्या ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.- अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर