शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

पांडुरंगाच्या दर्शनाला खुशाल जावा पण रस्त्याच्या उजव्या बाजूनं चाला

By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2023 19:11 IST

चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात.

सोलापूर : चैत्री वारीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील वारकरी बांधव दिंड्यानिशी पंढरपूरकडे पायी चालत जातात. यंदा २८ मार्च ते ६ एप्रिल या काळात अनेक रस्त्यांवर हे चित्र दिसणार आहे. अंधाऱ्या रात्री अथवा दिवसा पाठिमागून येणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळेअपघात होतात. म्हणून उजव्या बाजूने चालावे, यासाठी आरटीओ प्रशासनाकडून पथकांद्वारे सोमवारपासून प्रबोधन मोहीम सुरु करण्यात आली.

चैत्री वारीसाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. बरेच वारकरी हे पंढरपूरकडे पायी चालत येत असतात. बऱ्याचदा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये भरधाव वाहने घुसून अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागलेला आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर व भल्या पहाटे वाहनचालकांना गर्दीचा अंदाज येत नाही. तसेच वारकऱ्यांनाही पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही.

यासाठी सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथक क्रमांक १ मधील मोटार वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे,शिरीष तांदळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय जाधव, विद्यादेवी जाधव, कार्यालयीन वाहन चालक शिवाजी गायकवाड यांना वाहनांची तपासणी करताना वारीतील सर्वच भाविक रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी जात असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी सर्व भाविकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याबाबत मार्गदर्शन केले.पाच वायुवेग पथकाची नियुक्ती

यासाठी जनजागरण मोहीम राबवण्यासाठी यापुढे वारकऱ्यांची यात्रा सुरक्षित व विना अपघात होण्यासाठी, जीवित हानी टाळण्यासाठी चैत्र वारी निमित्त उप प्रा परिवहन कार्यालयाच्या वतीने ५ वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या वायुवेग पथकामार्फत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तसेच संध्याकाळी अंधार पडल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठीचे प्रबोधन करण्यात येणार आहे.सर्व भाविकांना चैत्र वारी निमित्त रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठी पाच वायुवेग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून उजव्या बाजूने चाला याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी फूटपाथ नाहीत त्या ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.- अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर