शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पाण्यावर अतिक्रमण.. उजनीला पेलवेना भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:22 IST

इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टीएमसी पाणी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उजनी ...

इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टीएमसी पाणी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उजनी जलाशयातील उपलब्ध पाणी आणि सद्य:स्थितीत झालेले पाणी वापराचे नियोजन यावरून वादाची स्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी देऊन त्याग केला अशा शेतकऱ्यांचा हक्क डावलून चालणार नाही. मात्र जलाशयात किती पाणी उपलब्ध आहे, नियोजनानंतर किती पाणी शिल्लक राहते याचाही विचार व्हायलाच हवा. वस्तुतः तसे होताना दिसत नाही, त्यामुळेच वाद उद्भवत असल्याचे अनेकांचे मत आहे.

------

बाष्पीभवनाच्या पाण्याचे गौडबंगाल

उजनी जलाशयाचे पाणी १४,८५६ चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्रात विस्तारले आहे. अथांग पसरलेल्या या जलाशयातून दरवर्षी १६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते, असे गृहीत धरण्यात आले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार कडक उन्हाळा असताना चार महिने उन्हाळ्यात झालेले सरासरी बाष्पीभवन १४ टीएमसी इतके झाल्याची नोंद आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार त्यात कमी-अधिक बदल होऊ शकतो. मात्र अभ्यासकांच्या मते मूळ प्रकल्पाच्या नियोजनानुसार तितकेसे बाष्पीभवन होत नाही. प्रत्यक्षातील बाष्पीभवन कमी होत असल्याने या नावाखाली शिल्लक राहणाऱ्या पाण्याचा वापर कुठे आणि कसा होतो यावर प्रश्नचिन्हच आहे.

-------

गाळाने १५ टीएमसी पाणीसाठ्यात घट

गेल्या ४० वर्षांत भीमा नदीला अनेकदा महापूर आले. पावसाच्या पाण्याबरोबर माती आणि नदीपात्रातील वाळू यामुळे उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. मुळात पाणलोट क्षेत्रात काळी माती आहे. सातत्याने गाळ साठत गेल्याने धरणाच्या साठवण क्षेत्रात घट झाली आहे. हा गाळ काढण्यासाठी महसूल खात्याने निविदा काढली. गाजावाजा करून गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपशाची यंत्रसामग्री धरणस्थळी दाखल झाली. जलसंपदा आणि महसूलच्या वादात घोडे अडले. हा गाळ काही प्रमाणात बाहेर निघाल्यास शासनाला वाळूतून महसूल मिळेल आणि धरणाची साठवणक्षमता वाढेल हा पर्याय ठरू शकतो.

-------

पाणीसाठा ११७ टीएमसी, १२१ टीएमसीचे नियोजन

धरणाचा संपूर्ण पाणीसाठा ११७ टीएमसी आहे त्यात साठलेल्या गाळामुळे सातत्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. अचल साठ्यातील किमान २० टक्के पाणी सोडण्याच्या पातळीखाली जाते. त्यामुळे कालव्यातून सोडता येत नाही. तरीही जलाशयातील उपसा, उजवा आणि डावा कालवा, मंजूर केलेल्या उपसा सिंचन योजना, पिण्यासाठी, औद्योगिक वापर, बाष्पीभवन यासह काही वर्षांपूर्वी कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेसाठी २१ टीएमसी हा पाणीवाटपाचा एकत्रित हिशेब १२१ टीएमसीच्या घरात जातो. उपलब्ध पाणी आणि वापराचे नियोजन यातील तफावत दूर करण्याचे नियोजन होताना दिसत नाही.

-----