शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावर अतिक्रमण.. उजनीला पेलवेना भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:22 IST

इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टीएमसी पाणी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उजनी ...

इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टीएमसी पाणी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उजनी जलाशयातील उपलब्ध पाणी आणि सद्य:स्थितीत झालेले पाणी वापराचे नियोजन यावरून वादाची स्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी देऊन त्याग केला अशा शेतकऱ्यांचा हक्क डावलून चालणार नाही. मात्र जलाशयात किती पाणी उपलब्ध आहे, नियोजनानंतर किती पाणी शिल्लक राहते याचाही विचार व्हायलाच हवा. वस्तुतः तसे होताना दिसत नाही, त्यामुळेच वाद उद्भवत असल्याचे अनेकांचे मत आहे.

------

बाष्पीभवनाच्या पाण्याचे गौडबंगाल

उजनी जलाशयाचे पाणी १४,८५६ चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्रात विस्तारले आहे. अथांग पसरलेल्या या जलाशयातून दरवर्षी १६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते, असे गृहीत धरण्यात आले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार कडक उन्हाळा असताना चार महिने उन्हाळ्यात झालेले सरासरी बाष्पीभवन १४ टीएमसी इतके झाल्याची नोंद आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार त्यात कमी-अधिक बदल होऊ शकतो. मात्र अभ्यासकांच्या मते मूळ प्रकल्पाच्या नियोजनानुसार तितकेसे बाष्पीभवन होत नाही. प्रत्यक्षातील बाष्पीभवन कमी होत असल्याने या नावाखाली शिल्लक राहणाऱ्या पाण्याचा वापर कुठे आणि कसा होतो यावर प्रश्नचिन्हच आहे.

-------

गाळाने १५ टीएमसी पाणीसाठ्यात घट

गेल्या ४० वर्षांत भीमा नदीला अनेकदा महापूर आले. पावसाच्या पाण्याबरोबर माती आणि नदीपात्रातील वाळू यामुळे उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. मुळात पाणलोट क्षेत्रात काळी माती आहे. सातत्याने गाळ साठत गेल्याने धरणाच्या साठवण क्षेत्रात घट झाली आहे. हा गाळ काढण्यासाठी महसूल खात्याने निविदा काढली. गाजावाजा करून गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपशाची यंत्रसामग्री धरणस्थळी दाखल झाली. जलसंपदा आणि महसूलच्या वादात घोडे अडले. हा गाळ काही प्रमाणात बाहेर निघाल्यास शासनाला वाळूतून महसूल मिळेल आणि धरणाची साठवणक्षमता वाढेल हा पर्याय ठरू शकतो.

-------

पाणीसाठा ११७ टीएमसी, १२१ टीएमसीचे नियोजन

धरणाचा संपूर्ण पाणीसाठा ११७ टीएमसी आहे त्यात साठलेल्या गाळामुळे सातत्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. अचल साठ्यातील किमान २० टक्के पाणी सोडण्याच्या पातळीखाली जाते. त्यामुळे कालव्यातून सोडता येत नाही. तरीही जलाशयातील उपसा, उजवा आणि डावा कालवा, मंजूर केलेल्या उपसा सिंचन योजना, पिण्यासाठी, औद्योगिक वापर, बाष्पीभवन यासह काही वर्षांपूर्वी कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेसाठी २१ टीएमसी हा पाणीवाटपाचा एकत्रित हिशेब १२१ टीएमसीच्या घरात जातो. उपलब्ध पाणी आणि वापराचे नियोजन यातील तफावत दूर करण्याचे नियोजन होताना दिसत नाही.

-----