शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पाण्यावर अतिक्रमण.. उजनीला पेलवेना भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:22 IST

इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टीएमसी पाणी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उजनी ...

इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टीएमसी पाणी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उजनी जलाशयातील उपलब्ध पाणी आणि सद्य:स्थितीत झालेले पाणी वापराचे नियोजन यावरून वादाची स्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी देऊन त्याग केला अशा शेतकऱ्यांचा हक्क डावलून चालणार नाही. मात्र जलाशयात किती पाणी उपलब्ध आहे, नियोजनानंतर किती पाणी शिल्लक राहते याचाही विचार व्हायलाच हवा. वस्तुतः तसे होताना दिसत नाही, त्यामुळेच वाद उद्भवत असल्याचे अनेकांचे मत आहे.

------

बाष्पीभवनाच्या पाण्याचे गौडबंगाल

उजनी जलाशयाचे पाणी १४,८५६ चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्रात विस्तारले आहे. अथांग पसरलेल्या या जलाशयातून दरवर्षी १६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते, असे गृहीत धरण्यात आले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार कडक उन्हाळा असताना चार महिने उन्हाळ्यात झालेले सरासरी बाष्पीभवन १४ टीएमसी इतके झाल्याची नोंद आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार त्यात कमी-अधिक बदल होऊ शकतो. मात्र अभ्यासकांच्या मते मूळ प्रकल्पाच्या नियोजनानुसार तितकेसे बाष्पीभवन होत नाही. प्रत्यक्षातील बाष्पीभवन कमी होत असल्याने या नावाखाली शिल्लक राहणाऱ्या पाण्याचा वापर कुठे आणि कसा होतो यावर प्रश्नचिन्हच आहे.

-------

गाळाने १५ टीएमसी पाणीसाठ्यात घट

गेल्या ४० वर्षांत भीमा नदीला अनेकदा महापूर आले. पावसाच्या पाण्याबरोबर माती आणि नदीपात्रातील वाळू यामुळे उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. मुळात पाणलोट क्षेत्रात काळी माती आहे. सातत्याने गाळ साठत गेल्याने धरणाच्या साठवण क्षेत्रात घट झाली आहे. हा गाळ काढण्यासाठी महसूल खात्याने निविदा काढली. गाजावाजा करून गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपशाची यंत्रसामग्री धरणस्थळी दाखल झाली. जलसंपदा आणि महसूलच्या वादात घोडे अडले. हा गाळ काही प्रमाणात बाहेर निघाल्यास शासनाला वाळूतून महसूल मिळेल आणि धरणाची साठवणक्षमता वाढेल हा पर्याय ठरू शकतो.

-------

पाणीसाठा ११७ टीएमसी, १२१ टीएमसीचे नियोजन

धरणाचा संपूर्ण पाणीसाठा ११७ टीएमसी आहे त्यात साठलेल्या गाळामुळे सातत्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. अचल साठ्यातील किमान २० टक्के पाणी सोडण्याच्या पातळीखाली जाते. त्यामुळे कालव्यातून सोडता येत नाही. तरीही जलाशयातील उपसा, उजवा आणि डावा कालवा, मंजूर केलेल्या उपसा सिंचन योजना, पिण्यासाठी, औद्योगिक वापर, बाष्पीभवन यासह काही वर्षांपूर्वी कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेसाठी २१ टीएमसी हा पाणीवाटपाचा एकत्रित हिशेब १२१ टीएमसीच्या घरात जातो. उपलब्ध पाणी आणि वापराचे नियोजन यातील तफावत दूर करण्याचे नियोजन होताना दिसत नाही.

-----