शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बदल्यांचा उडाला बट्ट्याबोळ

By admin | Updated: May 21, 2014 01:31 IST

जिल्हा परिषद : अपुर्‍या माहितीमुळे समुपदेशन पुढे ढकलले

सोलापूर: विकासकामांत नियोजनशून्य असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचारी बदल्यांचेही तीन-तेरा वाजविले. मंगळवारी बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यांतील कर्मचार्‍यांना बोलावले खरे, मात्र अपुरी माहिती व अन्य बाबींमुळे समुपदेशनाचा बट्ट्याबोळ झाला. जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रक प्रशासन विभागाने जाहीर केले होते. २० मेपासून सलग तीन दिवसांत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन जाहीर केले खरे, मात्र प्रत्यक्षात बदल्यांवेळी नियोजनाअभावी दांडी उडाली. ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या ५६ बदल्या करण्याचे नियोजन होते. त्यासाठी गटविकास अधिकार्‍यांकडून आलेल्या माहितीच्या आधारे बदल्यापात्र कर्मचार्‍यांची माहिती तयार करण्यात आली होती. परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. तालुक्यातील ग्रामसेवकांच्या संख्येच्या आकृतिबंधानुसार रिक्त असलेल्या ग्रामसेवकांच्या पदाची माहिती काही गटविकास अधिकार्‍यांनी दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकार्‍यांचे समुपदेशन झाले. ग्रामसेवकांची माहिती चुकीची असल्याने अचानक समुपदेशन रद्द करण्यात आले. बांधकाम खात्याचीही हीच अवस्था असल्याने बांधकाम खात्याचे समुपदेशन पुढे ढकलण्यात आले. आरोग्य खात्याच्या बदल्यांचे काम उशिरापर्यंत सुरू होते. जिल्हा परिषद विकासकामांचे नियोजन नसलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला कर्मचारी बदल्यांचेही नियोजन करता आले नाही.

---------------------------

बदल्यांचे ठिकाणही बदलले ४समुपदेशनाचे ठिकाण यशवंतराव चव्हाण सभागृह दिले असताना दुपारनंतर सीईओंच्या अँटीचेंबरमध्येच समुपदेशन उरकण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पोर्चसमोर जागा मिळेल तेथे बसलेल्या कर्मचार्‍यांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले होते. ४उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती दालनात असूनही कर्मचारी बदल्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष केले ४मागील दोन महिने आचारसंहितेच्या कारणामुळे विकासकामांना ‘ब्रेक’ लावणार्‍या प्रशासनाने किमान कर्मचारी बदल्यांचीही तयारी केली नाही ४पदाधिकारी व सीईओंच्या बेफिकिरीमुळे कर्मचार्‍यांनाही होतोय त्रास

--------------------------

कोणाचा पायपोस कोणाला नाही जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यांतून सकाळी-सकाळी कर्मचारी जि.प. परिसरात पोहोचले होते. विशेषत: आरोग्य खात्याच्या महिला कर्मचारीही सकाळीच आल्या होत्या. इकडे प्रशासनाची बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची कसलीच तयारी नव्हती. त्यामुळे दिवसभर कर्मचारी ताटकळत बसले होते. ग्रामसेवकांची अर्धवट माहिती दिल्याचे कारण सांगून ग्रामसेवकांना परत पाठविण्यात आले.

---------------------------

आरोग्य खात्याच्या ३५ बदल्या आरोग्य खात्याच्या एकूण ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या करावयाच्या होत्या. परंतु ३५ कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. आरोग्य सेविकांच्या १४, आरोग्य सेवकांच्या ९, आरोग्य सहायिका ३, सहायक ६, औषध निर्माण अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक एक तर आपसी बदली एक अशा ३५ कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील भडकुंबे यांनी सांगितले.

------------------

वेळेअभावी बांधकामच्या बदल्या पुढे ढकलल्या तर ग्रामसेवकांची माहिती अपुरी असल्याने होऊ त्या शकल्या नाहीत. या दोन्ही खात्याच्या बदल्यांचे वेळापत्रक नंतर सांगितले जाईल. - प्रभू जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी