शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भ्रष्टाचार निर्मूलन स्वत:पासून करा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सोलापूर जिल्ह्यात दक्षता व जनजागृती सप्ताहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:49 IST

भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. या किडीचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी येथे केले.

ठळक मुद्देभ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यकगाव पातळीपर्यंत त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ :  भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. या किडीचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे केले.दक्षता व जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हा प्रशासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रंगभवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते. कार्यक्रमास पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, ब्रिगेडयर सुनील बोधे, कर्नल विकास कोल्हे, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विधिज्ञ नीलेश जोशी यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, चुकीच्या कामाला वेळीच विरोध करण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. जनतेने मागितलेली माहिती त्यांना उपलब्ध करून देणे हे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे उत्तरदायित्व आहे असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले. ज्ञान ही प्रत्येकाची शक्ती असून प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना मिळवून देण्यासाठी यंत्रणेने काम करावे असेही ते म्हणाले. पोलीस आयुक्त तांबडे म्हणाले, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाची जनजागृती प्रभावीपणे करून व गाव पातळीपर्यंत त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यावेळी ब्रिगेडियर बोधे,अ‍ॅड. जोशी यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली.