शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

निवडणूक आली अन्‌ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमला कोट्यावधींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:18 IST

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला ...

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

गावातील अंतर्गत राजकारण व कर भरण्याबाबत नागरिकांची उदासीनता यामुळे वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे कर वसूल होत नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे विविध नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा कर इच्छुक उमेदवारांकडून भरण्यात येत असल्याने तालुक्यात तब्बल साडेतीन कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. ३० डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे कर थकीत नसल्याचा दाखला, रहिवासी, शौचालय आदी विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतीची बाकी भरल्याशिवाय आवश्यक दाखले ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दिले जात नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव गावातील इच्छुक उमेदवारांकडून वर्षानुवर्षे थकीत असलेली लाखो रुपयांची विविध प्रकारची बाकी भरण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी जवळपास ३,१६६ उमेदवारांनी ३,३३३ अर्ज दाखल केले आहेत. यामधील प्रत्येक उमेदवाराने सरासरी १० हजार रुपये बाकी धरली तरी हा आकडा ३ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वारंवार विनंत्या, नियम, अटी घालूनही ग्रामपंचायतींचा वसूल न होणारा महसूल ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने वसूल झाला आहे.

उमेदवारांची बाकी पॅनलप्रमुखांनी भरली

गावात ग्रामपंचायत निवडणूक आली की प्रत्येक गटाकडून स्वतंत्र पॅनल करण्याची धावपळ सुरू असते. त्यासाठी आरक्षणनिहाय प्रत्येक प्रभागात त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची गरज असते. अशावेळी प्रत्येक गटाला उमेदवार मिळेल याची खात्री नसते. उमेदवार मिळाला तर ग्रामपंचायतीची थकीत बाकी भरण्याची परिस्थिती त्या उमेदवाराची नसते. मात्र पॅनल टाकण्यासाठी उमेदवार आवश्यक असल्याने अशा उमेदवारांची ग्रामपंचायत थकबाकी त्या त्या गटाच्या पॅनलप्रमुखांनाच भरावी लागत असल्याचे चित्र आहे. सध्या प्रत्येक गावात पॅनलप्रमुखांनी लाखो रूपयांची बाकी स्वखर्चातून भरली असल्याने ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ झाली आहे.

----