शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आली अन्‌ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमला कोट्यावधींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:18 IST

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला ...

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

गावातील अंतर्गत राजकारण व कर भरण्याबाबत नागरिकांची उदासीनता यामुळे वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे कर वसूल होत नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे विविध नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा कर इच्छुक उमेदवारांकडून भरण्यात येत असल्याने तालुक्यात तब्बल साडेतीन कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. ३० डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे कर थकीत नसल्याचा दाखला, रहिवासी, शौचालय आदी विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतीची बाकी भरल्याशिवाय आवश्यक दाखले ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दिले जात नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव गावातील इच्छुक उमेदवारांकडून वर्षानुवर्षे थकीत असलेली लाखो रुपयांची विविध प्रकारची बाकी भरण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी जवळपास ३,१६६ उमेदवारांनी ३,३३३ अर्ज दाखल केले आहेत. यामधील प्रत्येक उमेदवाराने सरासरी १० हजार रुपये बाकी धरली तरी हा आकडा ३ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वारंवार विनंत्या, नियम, अटी घालूनही ग्रामपंचायतींचा वसूल न होणारा महसूल ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने वसूल झाला आहे.

उमेदवारांची बाकी पॅनलप्रमुखांनी भरली

गावात ग्रामपंचायत निवडणूक आली की प्रत्येक गटाकडून स्वतंत्र पॅनल करण्याची धावपळ सुरू असते. त्यासाठी आरक्षणनिहाय प्रत्येक प्रभागात त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची गरज असते. अशावेळी प्रत्येक गटाला उमेदवार मिळेल याची खात्री नसते. उमेदवार मिळाला तर ग्रामपंचायतीची थकीत बाकी भरण्याची परिस्थिती त्या उमेदवाराची नसते. मात्र पॅनल टाकण्यासाठी उमेदवार आवश्यक असल्याने अशा उमेदवारांची ग्रामपंचायत थकबाकी त्या त्या गटाच्या पॅनलप्रमुखांनाच भरावी लागत असल्याचे चित्र आहे. सध्या प्रत्येक गावात पॅनलप्रमुखांनी लाखो रूपयांची बाकी स्वखर्चातून भरली असल्याने ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ झाली आहे.

----