शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

निवडणूक आली अन्‌ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमला कोट्यावधींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:18 IST

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला ...

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

गावातील अंतर्गत राजकारण व कर भरण्याबाबत नागरिकांची उदासीनता यामुळे वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे कर वसूल होत नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे विविध नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा कर इच्छुक उमेदवारांकडून भरण्यात येत असल्याने तालुक्यात तब्बल साडेतीन कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. ३० डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे कर थकीत नसल्याचा दाखला, रहिवासी, शौचालय आदी विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतीची बाकी भरल्याशिवाय आवश्यक दाखले ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दिले जात नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव गावातील इच्छुक उमेदवारांकडून वर्षानुवर्षे थकीत असलेली लाखो रुपयांची विविध प्रकारची बाकी भरण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी जवळपास ३,१६६ उमेदवारांनी ३,३३३ अर्ज दाखल केले आहेत. यामधील प्रत्येक उमेदवाराने सरासरी १० हजार रुपये बाकी धरली तरी हा आकडा ३ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वारंवार विनंत्या, नियम, अटी घालूनही ग्रामपंचायतींचा वसूल न होणारा महसूल ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने वसूल झाला आहे.

उमेदवारांची बाकी पॅनलप्रमुखांनी भरली

गावात ग्रामपंचायत निवडणूक आली की प्रत्येक गटाकडून स्वतंत्र पॅनल करण्याची धावपळ सुरू असते. त्यासाठी आरक्षणनिहाय प्रत्येक प्रभागात त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची गरज असते. अशावेळी प्रत्येक गटाला उमेदवार मिळेल याची खात्री नसते. उमेदवार मिळाला तर ग्रामपंचायतीची थकीत बाकी भरण्याची परिस्थिती त्या उमेदवाराची नसते. मात्र पॅनल टाकण्यासाठी उमेदवार आवश्यक असल्याने अशा उमेदवारांची ग्रामपंचायत थकबाकी त्या त्या गटाच्या पॅनलप्रमुखांनाच भरावी लागत असल्याचे चित्र आहे. सध्या प्रत्येक गावात पॅनलप्रमुखांनी लाखो रूपयांची बाकी स्वखर्चातून भरली असल्याने ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ झाली आहे.

----