शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानात वाढीसाठी प्रयत्न होणार

By admin | Updated: November 18, 2014 14:49 IST

विशेष घटक योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यावर जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती, अध्यक्षा तसेच सीईओंची चर्चा झाली.

 सोलापूर : विशेष घटक योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यावर जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती, अध्यक्षा तसेच सीईओंची चर्चा झाली. सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन कृषी, ग्रामविकास व समाजकल्याण मंत्र्यांना भेटणार असल्याचे सभापतींनी सांगितले.'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती पंडित वाघ यांनी अध्यक्षा जयमाला गायकवाड व सीईओ सुरेश काकाणी यांच्याशी चर्चा केली. अनुसूचित जातीच्या शेतकर्‍यांसाठी विशेष घटक योजनेतून विहीर व औजारासाठी अनुदान दिले जाते. विहिरीसाठी एक लाख तर औजारासाठी दिले जाणारे ५0 हजार इतके अनुदान तुटपुंजे असल्याचे वृत्त 'लोकमत' ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. कृषी समितीचे सभापती वाघ यांनी विहिरीसाठी तीन लाख तर औजारासाठी एक लाख इतके अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी यासाठी सीईओंनी थेट सचिवांशी चर्चा करावी असा मुद्दा मांडला. येत्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव घेऊन त्याचा पाठपुरावा संबंधित मंत्र्याकडे स्वत: सभापती म्हणून मी करतो असे वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

प्रभाव लोकमतचा

अधिकार द्यावेत..  ■ ठिबक सिंचनच्या प्रस्तावावर कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशा सहा सह्या शिवाय तीन कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या तपासण्या असतात. ही लांबलचक असलेली पद्धत कमी करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेप्रमाणे वर्ग-३, वर्ग-४ दर्जाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार जिल्हास्तरावर असणेही गरजेचे आहे. शेततळ्यांचा समावेश करा ■ मागासवर्गीय शेतकर्‍यांना विहीर व औजारासाठीच्या अनुदानात वाढ तर केलीच पाहिजे याशिवाय शेततळ्याचाही समावेश करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे सभापती पंडित वाघ यांनी सांगितले. मागासवर्गीय शेतकर्‍यांकडे गुंतविण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे विहीर, औजारे व शेततळ्याच्या अनुदानात वाढ करण्याची गरज असल्याचे वाघ यांनी सांगितले.