शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

शतकानंतरही पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माळशिरस : स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेल्वेचा विस्तार झपाट्याने झाला. अनेक मोठ्या रेल्वे मार्गाची निर्मिती झाली. इंग्रज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माळशिरस : स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेल्वेचा विस्तार झपाट्याने झाला. अनेक मोठ्या रेल्वे मार्गाची निर्मिती झाली. इंग्रज कालीन सर्वे व मंजूर असलेल्या लोणंद-पंढरपूर रेल्वेला मात्र शतक उलटूनही धावण्याची वाट पाहावी लागत आहे. दोन दशकांपासून या मार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत. इतके वर्ष उलटूनही हा मार्ग का रखडला ? अशा उनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.

रेल्वे प्रश्नासाठी अनेक नेतेमंडळींनी वेगवेगळ्या नेत्यांकडे शेकडो निवेदने दिली आहेत. मात्र या प्रश्नासाठी कुठलाही नेता अथवा कोणत्याही पक्षात आक्रमकता दिसली नाही. या मार्गासाठी लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीचा व प्रयत्नांचा जनरेटा वाढवण्याची गरज आहे. सध्या हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या मार्गाचा सर्व्हे नव्याने सुरू झाला आहे. याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. पूर्वीचा व नवा सर्व्हे संदर्भातला निर्णय लवकरच समोर येणार आहे. त्यामुळे या मार्गाबाबतच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

-----

यांनी दिला रेल्वेला धक्का ...

लोकसभेच्या जुन्या पंढरपूर व नव्या माढा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात या रेल्वेमार्गाच्या मुद्द्याची ढाल केली होती. माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी या मार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१० पासून रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी जागृती केली. आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला. तत्कालीन खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी संसदेत पाठपुरावा केला. त्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडूनही प्रयत्न झाले. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते यांच्यासह अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.

-----

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अकलूजच्या सभेत यासंदर्भातील सूचक आश्वासन दिले होते. त्यानंतर सर्वेक्षणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूदही झाली. मात्र सध्या यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा आहे. लवकरच याप्रक्रियेला गती येईल.

- रणजितसिंह मोहिते-पाटील

आमदार