शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

शतकानंतरही पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माळशिरस : स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेल्वेचा विस्तार झपाट्याने झाला. अनेक मोठ्या रेल्वे मार्गाची निर्मिती झाली. इंग्रज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माळशिरस : स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेल्वेचा विस्तार झपाट्याने झाला. अनेक मोठ्या रेल्वे मार्गाची निर्मिती झाली. इंग्रज कालीन सर्वे व मंजूर असलेल्या लोणंद-पंढरपूर रेल्वेला मात्र शतक उलटूनही धावण्याची वाट पाहावी लागत आहे. दोन दशकांपासून या मार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत. इतके वर्ष उलटूनही हा मार्ग का रखडला ? अशा उनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.

रेल्वे प्रश्नासाठी अनेक नेतेमंडळींनी वेगवेगळ्या नेत्यांकडे शेकडो निवेदने दिली आहेत. मात्र या प्रश्नासाठी कुठलाही नेता अथवा कोणत्याही पक्षात आक्रमकता दिसली नाही. या मार्गासाठी लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीचा व प्रयत्नांचा जनरेटा वाढवण्याची गरज आहे. सध्या हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या मार्गाचा सर्व्हे नव्याने सुरू झाला आहे. याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. पूर्वीचा व नवा सर्व्हे संदर्भातला निर्णय लवकरच समोर येणार आहे. त्यामुळे या मार्गाबाबतच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

-----

यांनी दिला रेल्वेला धक्का ...

लोकसभेच्या जुन्या पंढरपूर व नव्या माढा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात या रेल्वेमार्गाच्या मुद्द्याची ढाल केली होती. माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी या मार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१० पासून रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी जागृती केली. आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला. तत्कालीन खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी संसदेत पाठपुरावा केला. त्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडूनही प्रयत्न झाले. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते यांच्यासह अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.

-----

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अकलूजच्या सभेत यासंदर्भातील सूचक आश्वासन दिले होते. त्यानंतर सर्वेक्षणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूदही झाली. मात्र सध्या यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा आहे. लवकरच याप्रक्रियेला गती येईल.

- रणजितसिंह मोहिते-पाटील

आमदार