शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

कर्नाटक राज्यात दहावी-बारावीची परीक्षा होणार एकत्रित : शिक्षणमंत्री तन्वीर सेठ 

By appasaheb.dilip.patil | Updated: July 25, 2017 20:46 IST

विजयपूर दि २५ :  कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देएकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारसमोर मांडण्यात आलाप्रश्नपत्रिका आॅनलाईन पुरविणारशिक्षण खात्यासमोर आव्हानएकाच परीक्षागृहात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा

आॅनलाइन लोकमत सोलापूरविजयपूर दि २५ :  कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षण खाते आणि पदवीपूर्व महामंडळाच्यावतीने यावर निर्णय घेतला जाणार आहे. शिक्षणमंत्र्यांनीही याला हिरवा कंदील दाखविला आहे.मार्च व एप्रिल २०१८ मध्ये होऊ घातलेल्या या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या संदभार्तील अंतिम निर्णय आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवडयात घेतला जाणार आहे. एकाच परीक्षागृहात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. एका बेंचवर दहावीचा तर त्या मागील बेंचवर बारावीचा विद्यार्थी बसवून परीक्षा घेण्याचा उद्देश आखण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री तन्वीर सेठ यांनी दिली. सध्याच्या कल्पनेनुसार दोन्ही परीक्षांची वेळापत्रके बनवितानाच योग्य ती काळजी घेऊन एकाच तारखेला दोन्ही परीक्षा सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, यासाठीची व्यवस्था करताना खात्याची डोकेदुखी वाढणार आहे. यंदा दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संपूर्ण कर्नाटक राज्यभरात ८ लाख इतकी आहे. तर बारावीच्या वगार्तील   कर्नाटक राज्यभरातील विद्यार्थी सहा लाख आहेत. एकाच वेळी 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना योग्य व्यवस्था असणाºया परीक्षा केंदांची स्थापना करणे गरजेचे बनणार आहे.कर्नाटक राज्यभरात सरकारी आणि अनुदानित माध्यमिक शाळांची संख्या 16 हजार आहे. तर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांची संख्या 5 हजार आहे. या सर्व ठिकाणी परीक्षा केंदे स्थापन करण्याची सोय मात्र नाही. शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींची दुरवस्था पाहता परीक्षा केंदे स्थापन करण्यासाठी शिक्षण खात्याला खासगी शाळा व महाविद्यालयांचाच आसरा घ्यावा लागतो. या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना विचारले असता सध्या याबाबत सखोल चर्चा सुरू आहे. त्यावर नक्कीच मार्ग काढला जाईल. परीक्षा पद्धतीत बदल करण्याची ही दुसरी वेळ असून त्यावर नक्कीच मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.----------------------शिक्षण खात्यासमोर आव्हानया दोन्ही परीक्षांसाठी लागणारा वेळ वाचविणे आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांवर आळा घालणे हा प्रमुख उद्देश आहे. कोणत्याही गैरप्रकारांशिवाय परीक्षा घेणे हे आता शिक्षण खात्यासमोर आव्हान बनले आहे. पेपर फुटी, कॉपी आणि सामुदायिक कॉपी हे प्रकारच आव्हानात्मक ठरले आहेत. दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्यास ही आव्हाने ९० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी लागणाºयाकर्मचाºयांची संख्या कमी होईल. तसेच वाहतुकीचा खर्चही वाचेल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

----------------------प्रश्नपत्रिका आॅनलाईन पुरविणारपेपरफुटीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी दहावी आणि बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने पुरविण्याबाबत आतापासून जोर दिला जात आहे. प्रत्येक जि'ातील केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवून त्या इतर केंद्रांवर पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या यासाठी लागणा?या कालावधीचा अभ्यास सुरू आहे. ही योजना जाहीर करण्यापूर्वी योग्य ती प्रात्यक्षिके घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.