शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक राज्यात दहावी-बारावीची परीक्षा होणार एकत्रित : शिक्षणमंत्री तन्वीर सेठ 

By appasaheb.dilip.patil | Updated: July 25, 2017 20:46 IST

विजयपूर दि २५ :  कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देएकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारसमोर मांडण्यात आलाप्रश्नपत्रिका आॅनलाईन पुरविणारशिक्षण खात्यासमोर आव्हानएकाच परीक्षागृहात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा

आॅनलाइन लोकमत सोलापूरविजयपूर दि २५ :  कर्नाटक राज्यात दरवषी सर्वप्रथम बारावीची परीक्षा घेऊन त्यानंतर दहावी परीक्षेकडे वळणाºया शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षात या दोन्ही परीक्षा एकत्रित म्हणजेच एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षण खाते आणि पदवीपूर्व महामंडळाच्यावतीने यावर निर्णय घेतला जाणार आहे. शिक्षणमंत्र्यांनीही याला हिरवा कंदील दाखविला आहे.मार्च व एप्रिल २०१८ मध्ये होऊ घातलेल्या या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या संदभार्तील अंतिम निर्णय आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवडयात घेतला जाणार आहे. एकाच परीक्षागृहात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. एका बेंचवर दहावीचा तर त्या मागील बेंचवर बारावीचा विद्यार्थी बसवून परीक्षा घेण्याचा उद्देश आखण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री तन्वीर सेठ यांनी दिली. सध्याच्या कल्पनेनुसार दोन्ही परीक्षांची वेळापत्रके बनवितानाच योग्य ती काळजी घेऊन एकाच तारखेला दोन्ही परीक्षा सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, यासाठीची व्यवस्था करताना खात्याची डोकेदुखी वाढणार आहे. यंदा दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संपूर्ण कर्नाटक राज्यभरात ८ लाख इतकी आहे. तर बारावीच्या वगार्तील   कर्नाटक राज्यभरातील विद्यार्थी सहा लाख आहेत. एकाच वेळी 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना योग्य व्यवस्था असणाºया परीक्षा केंदांची स्थापना करणे गरजेचे बनणार आहे.कर्नाटक राज्यभरात सरकारी आणि अनुदानित माध्यमिक शाळांची संख्या 16 हजार आहे. तर सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांची संख्या 5 हजार आहे. या सर्व ठिकाणी परीक्षा केंदे स्थापन करण्याची सोय मात्र नाही. शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींची दुरवस्था पाहता परीक्षा केंदे स्थापन करण्यासाठी शिक्षण खात्याला खासगी शाळा व महाविद्यालयांचाच आसरा घ्यावा लागतो. या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना विचारले असता सध्या याबाबत सखोल चर्चा सुरू आहे. त्यावर नक्कीच मार्ग काढला जाईल. परीक्षा पद्धतीत बदल करण्याची ही दुसरी वेळ असून त्यावर नक्कीच मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.----------------------शिक्षण खात्यासमोर आव्हानया दोन्ही परीक्षांसाठी लागणारा वेळ वाचविणे आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांवर आळा घालणे हा प्रमुख उद्देश आहे. कोणत्याही गैरप्रकारांशिवाय परीक्षा घेणे हे आता शिक्षण खात्यासमोर आव्हान बनले आहे. पेपर फुटी, कॉपी आणि सामुदायिक कॉपी हे प्रकारच आव्हानात्मक ठरले आहेत. दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्यास ही आव्हाने ९० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी लागणाºयाकर्मचाºयांची संख्या कमी होईल. तसेच वाहतुकीचा खर्चही वाचेल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

----------------------प्रश्नपत्रिका आॅनलाईन पुरविणारपेपरफुटीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी दहावी आणि बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने पुरविण्याबाबत आतापासून जोर दिला जात आहे. प्रत्येक जि'ातील केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवून त्या इतर केंद्रांवर पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या यासाठी लागणा?या कालावधीचा अभ्यास सुरू आहे. ही योजना जाहीर करण्यापूर्वी योग्य ती प्रात्यक्षिके घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.