शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

महाविकास आघाडीच्या काळात राजकारणाचे झाले गुन्हेगारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. या नंतर झालेल्या कार्यकर्त्यांचा मेळाव्या प्रसंगी चंद्रकांत ...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. या नंतर झालेल्या कार्यकर्त्यांचा मेळाव्या प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख, राम शिंदे, श्रीकांत भारती, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, संभाजी निलंगेकर आदी आमदार, नगराध्यक्षा साधना भोसले, उपसभापती राजश्री भोसले, आरपीआयचे राजाभाऊ सरवदे, रयत क्रांतीचे दीपक भोसले, डॉ.बी.पी.रोंगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील यांनी, हे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांना फसवत असल्याचा आरोप केला. अतिवृष्टी मदत, कोरोना काळातील अपयश, वीज तोडणी व आता वाझे प्रकरण या सर्वांचा परिणाम म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेच्या या सरकारच्या विरोधात कौल दिला. साडे सहा हजार ठिकाणी भाजपाचे सरपंच नियुक्त झाले. यामुळे जाणता राजा घाबरला आणि त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तातडीने पुढील निवडणुका न घेण्याची सूचना केली. यामुळे ५ महानगरपालिका, ९२ नगर परिषदा तसेच शेकडो सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

त्यानंतर समाधान आवताडे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर असून त्यांच्यामुळे संपूर्ण देशात राज्याची बदनामी झाली आहे. लवकरच हे सरकार खाली उतरणार असून भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात मागील तीनवेळा जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने प्रश्‍न सोडविले नाहीत. मतदानामधून ही नाराजी बाहेर पडणार असून परिचारक यांच्या मदतीने दोन तारखेला गुलाल घेऊनच मुंबईत जाणार असल्याचा विश्‍वास समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. खा. जयसिध्देश्‍वर स्वामी यांनी, राज्याच्या सत्ता परिवर्तनाचे बिगुल पंढरीतून वाजले असल्याचे सूचक वक्तव्य केले. पंढरीतून परिवर्तन होणार असून ते राज्यामध्ये देखील लवकरच होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

राम व लक्ष्मणाची जोडी ::::::

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक या बंधूचा उल्लेख राम लक्ष्मणाची जोडी असा केला. आजच्या जगात एखाद्या व्यक्तीकडे दोन रूमाल असतील तर तो एक रूमाल देणार नाही. परंतु या परिचारक बंधूनी मनाचा मोठेपणा दाखवत समाधान आवताडे यांच्यासाठी माघार घेतली. दोघांपैकी एकानेच निवडणुकीच्या रिंगणात उभे रहावे असा विचार पक्षाने मांडल्या नंतर यावर प्रशांत परिचारक यांची दावेदारी होती. मात्र त्यांनी मोठे मन करून आवताडे यांना संधी दिली. यामुळे भाजपा परिचारक यांचा आभारी आहे या शब्दात कौतुक केले.

फोटो :::::::::::::::

पंढरपूर येथे कार्यकर्ता मेळाव्यानिमत्त एकत्र आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राम शिंदे, बाळाभाऊ भेगडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रशांत परिचारक, श्रीकांत देशमुख,