शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST

या नगरपंचायतीवर माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची १० मार्च २०२१ रोजी नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून ते आजअखेरपर्यंत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीकडे ...

या नगरपंचायतीवर माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची १० मार्च २०२१ रोजी नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून ते आजअखेरपर्यंत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीकडे फिरकलेच नाहीत.

महाळुंग येथून श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग जात आहे. या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे गेली आहेत. त्या शेतकऱ्यांना नगरपंचायतीकडून येणेबाकी नसल्याचा दाखला जोडणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु दाखल्यासाठी नगरपंचायतीकडून शेतकऱ्यांची बाकी भरून घेतली जात नाही व दाखला दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळणार नाहीत.

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही पैसे घ्यायचे नाहीत व त्याची पावतीही द्यायची नाही, असे प्रशासकाने तोंडी आदेश दिल्याने नगरपंचायतीमधील कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे ३४ कामगारांपैकी पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभाग याव्यतिरिक्त इतर सर्व कामगारांना नगरपंचायतीमध्ये बसून राहण्याची वेळ आली आहे. जर महाळुंग-श्रीपूर परिसराला होणारा सार्वजनिक पाणीपुरवठा काही अडचणीमुळे बंद पडल्यास कर्मचाऱ्यांना कोणतेही आदेश नसल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी मोठा त्रास होणार आहे.

महाळुंग-श्रीपूर परिसरात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सर्व यंत्रणा बंद असल्याने त्याबाबत जनजागृतीचे कामही पूर्णपणे बंद पडले आहे.

याबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून नगरपंचायतीचे कामकाज व व्यवहार सुरळीत करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

जन्म अन‌् मृत्यू दाखल्यांची नोंदच नाही

सर्वसामान्य ग्रामस्थांचे महत्त्वाच्या असलेल्या जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांबाबत जन्म अन‌् मृत्यू रजिस्टरला कोणतीही नोंद घेतली जात नाही. एका महिन्यात नगरपंचायतीकडे नाव नोंदणी झाली नाही तर सदर संबंधित ग्रामस्थांना कोर्टामार्फत नोंद करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना जन्म व मृत्यूची नावनोंदणी मोठी जाचक व खर्चिक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही नाव नोंदणी त्वरित सुरू करावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.