शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्स येईना; आता भिस्त स्पेन, इराणवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST

सोलापूर : अफगाणिस्तानातील तणावाच्या वातावरणाचा परिणाम ड्रायफ्रूट्सच्या व्यापारावर झाला आहे. मागील चार दिवसांपासून अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्सच्या गाड्या येणे बंद झाल्या ...

सोलापूर : अफगाणिस्तानातील तणावाच्या वातावरणाचा परिणाम ड्रायफ्रूट्सच्या व्यापारावर झाला आहे. मागील चार दिवसांपासून अफगाणिस्तानातून ड्रायफ्रूट्सच्या गाड्या येणे बंद झाल्या आहेत. आता व्यापारी अफगाणिस्तानावर विसंबून न राहता स्पेन, इराणमधील माल मागविण्याच्या विचारात आहेत. सध्या मुंबईतच मालाचा तुटवडा असल्याने सोलापूरच्या व्यापाऱ्यांना आणखी काही दिवस वाटच पाहावी लागणार आहे. परिणामी ड्रायफ्रूटसच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.

अफगाणिस्तानावर तालिबान दहशतवादी संघटनेने हल्ला करून कब्जा मिळविला आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला आहे. अफगाणिस्तानातील कंदार, काबूल शहरातून पिस्ता, अंजीर, जर्दाळू, खिसमिस, काळा मणुका, बदाम, खजूर, केसर आदी ड्रायफ्रूट्स मागविले जातात. या तणावाच्या वातावरणामुळे गेल्या चार दिवसांपासून मालच आलेला नाही. सोलापूरचे व्यापारी रोज मुंबईच्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात असतात. मात्र, मालच आलेला नाही, कधी येईल हे सांगता येत नाही, स्पेन, इराणच्या व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडूनही माल येण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस वाटच पाहावी लागणार आहे.

..............

..अशी झाली दरात वाढ

ड्रायफ्रूट्स तणावपूर्वीचे दर आताचे दर.

पिस्ता : १६०० २०००

बदाम : ८०० ११००

अंजीर : १४०० १६००

खिसमिस : ४५० ७००

जर्दाळू : ६०० ७००

काळे मणुके : २८० ३००

..........

आलेला माल खराब निघाला

जहाजाने वाशी मार्केटमध्ये चार-पाच दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातून अंजीरचे चार ते पाच कंटेनर पाठविण्यात आले होते. माल पूर्णपणे खराब निघाला. त्या मालावरच प्रक्रियाच केली नव्हती. कोल्ड स्टोरेज उपलब्ध न झाल्याने अंजीर पूर्णपणे काळा पडल्याचे मुंबईतील व्यापाऱ्यांनी सांगितले.

.........

पंधरा दिवस पुरेल एवढाच स्टॉक शिल्लक

सोलापूरच्या बाजारात सध्या पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच ड्रायफ्रूट्सचा माल उपलब्ध आहे. तोपर्यंत माल न आल्यास तुटवडा निर्माण होणार आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास दिवाळीत दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

.........

दर पूर्ववत होण्यास एक वर्ष लागेल

आता ड्रायफ्रूट्सच्या दरात वाढ होत आहे. येणाऱ्या काळात त्या आणखी वाढच होणार आहे. जोपर्यंत अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत दरही कमी होणार नाही. त्यासाठी आता किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

- नागनाथ अक्कलकोटे, व्यापारी

......

मुंबईतील व्यापारी अफगाणिस्तानातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत आहेत. काही दिवस थांबा. परिस्थिती सुधारेल आणि माल पाठविण्याची व्यवस्था होईल, सांगण्यात येत आहे. तोपर्यंत दर वाढतच राहणार आहे.

- नंदकिशोर तिवाडी, व्यापारी