शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

तुमचा किमती मोबाइल देऊ नका कोणाला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

सोलापूर : सोशल मीडिया, डिजिटल प्रणालीमुळे प्रगतीचे दालन खुले झाले आहे. तितकाच धोकाही वाढला आहे. आपल्या छोट्याशा मोबाइलवरील क्लिकमुळे ...

सोलापूर : सोशल मीडिया, डिजिटल प्रणालीमुळे प्रगतीचे दालन खुले झाले आहे. तितकाच धोकाही वाढला आहे. आपल्या छोट्याशा मोबाइलवरील क्लिकमुळे गंडा बसू शकतो. वेगवेगळ्या फसव्या लिंक भुरळ पाडून गंडवण्यासाठी टपल्या आहेत. यामुळे आपली पर्सनल माहिती कुठेही शेअर करू नये. अगदी आपल्या जवळचा मोबाइल जरी कोणी अनोळखीने कॉलसाठी मागितला तरीही देऊन नका अन्यथा तुमच्या डोळ्यादेखत बँक खात्यावरील बॅलन्स गायब होऊ शकतो.

सोशल मीडियावरील वेगवेगळ्या फसव्या आमिष दाखवणाऱ्या जाहिराती, ऑफर्समुळे ग्राहक आकर्षिला जातो. मोबाइलवर येणाऱ्या कोणत्याही लिंक अथवा अनोळखी मेसेजेसला उत्तर देताना त्यात कितपत तथ्य आहे. हे पाहणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्याशी अनोळखी मंडळी संवाद साधताना आपली पर्सनल माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतील. अशा मंडळीपासून लोकांनी सावध राहावे, अशी माहिती सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे व पोलीस उपनिरीक्षक विसेंद्र बायस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

-----

फसवणुकीसाठी अशी वापरली जाती युक्ती

१ एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून तुमचा मोबाइल नंबर शोधतात. तुमच्या एटीएम कार्डची व्हॅलिडिटी संपली आहे. आपली माहिती मागवतात. अशा फोनला प्रामुख्याने गृहिणी, वृद्ध मंडळी फसल्या जातात आणि माहिती सांगून मोकळी होतात.

२ आपल्या व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, ट्वीटवर फेक लिंक येते. ती डाऊनलोड करायला सांगतात. मग ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पर्सनल माहिती देण्याची सांगितले जाते. या माहितीद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात.

३ अनेकांना कुठेही कोणताही फाॅर्म भरलेला नसला, तरी मोबाइलवर मोठ्या रकमेची लॉटरी लागली आहे, एवढी रक्कम भरा म्हणून आपला डेबीट कार्ड क्रमांक, पिन विचारला जाऊ शकतो. असे केल्याने तुमच्या माहितीद्वारे ही फेक मंडळी तुमच्या पैशावर डल्ला मारू शकतात.

४ सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. याद्वारे आपली ओळख वाढवून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

----

दररोज किमान चार जण तरी फसतात

- वाढती बेरोजगारी यामुळे झटपट पैसा मिळवण्याच्या नादात फेक मंडळी लोकांचा गैरफायदा घेऊन फसवण्याचे प्रयत्न करतात. मात्र, आपण अशा प्रकारांना बळी न पडता आपली कोणतीही माहिती शेअर नाही केली तरी असे प्रकार घडणार नाहीत. सध्या सायबर यंत्रणेकडे दररोज तीन ते चार तरी अशा प्रकारची तक्रारी येतात. यासाठी खबरदारी घ्यावी.

- विसेंद्र बायस, पोलीस उपनिरीक्षक

-----