शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा किमती मोबाइल देऊ नका कोणाला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

सोलापूर : सोशल मीडिया, डिजिटल प्रणालीमुळे प्रगतीचे दालन खुले झाले आहे. तितकाच धोकाही वाढला आहे. आपल्या छोट्याशा मोबाइलवरील क्लिकमुळे ...

सोलापूर : सोशल मीडिया, डिजिटल प्रणालीमुळे प्रगतीचे दालन खुले झाले आहे. तितकाच धोकाही वाढला आहे. आपल्या छोट्याशा मोबाइलवरील क्लिकमुळे गंडा बसू शकतो. वेगवेगळ्या फसव्या लिंक भुरळ पाडून गंडवण्यासाठी टपल्या आहेत. यामुळे आपली पर्सनल माहिती कुठेही शेअर करू नये. अगदी आपल्या जवळचा मोबाइल जरी कोणी अनोळखीने कॉलसाठी मागितला तरीही देऊन नका अन्यथा तुमच्या डोळ्यादेखत बँक खात्यावरील बॅलन्स गायब होऊ शकतो.

सोशल मीडियावरील वेगवेगळ्या फसव्या आमिष दाखवणाऱ्या जाहिराती, ऑफर्समुळे ग्राहक आकर्षिला जातो. मोबाइलवर येणाऱ्या कोणत्याही लिंक अथवा अनोळखी मेसेजेसला उत्तर देताना त्यात कितपत तथ्य आहे. हे पाहणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्याशी अनोळखी मंडळी संवाद साधताना आपली पर्सनल माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतील. अशा मंडळीपासून लोकांनी सावध राहावे, अशी माहिती सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे व पोलीस उपनिरीक्षक विसेंद्र बायस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

-----

फसवणुकीसाठी अशी वापरली जाती युक्ती

१ एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून तुमचा मोबाइल नंबर शोधतात. तुमच्या एटीएम कार्डची व्हॅलिडिटी संपली आहे. आपली माहिती मागवतात. अशा फोनला प्रामुख्याने गृहिणी, वृद्ध मंडळी फसल्या जातात आणि माहिती सांगून मोकळी होतात.

२ आपल्या व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, ट्वीटवर फेक लिंक येते. ती डाऊनलोड करायला सांगतात. मग ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पर्सनल माहिती देण्याची सांगितले जाते. या माहितीद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात.

३ अनेकांना कुठेही कोणताही फाॅर्म भरलेला नसला, तरी मोबाइलवर मोठ्या रकमेची लॉटरी लागली आहे, एवढी रक्कम भरा म्हणून आपला डेबीट कार्ड क्रमांक, पिन विचारला जाऊ शकतो. असे केल्याने तुमच्या माहितीद्वारे ही फेक मंडळी तुमच्या पैशावर डल्ला मारू शकतात.

४ सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. याद्वारे आपली ओळख वाढवून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

----

दररोज किमान चार जण तरी फसतात

- वाढती बेरोजगारी यामुळे झटपट पैसा मिळवण्याच्या नादात फेक मंडळी लोकांचा गैरफायदा घेऊन फसवण्याचे प्रयत्न करतात. मात्र, आपण अशा प्रकारांना बळी न पडता आपली कोणतीही माहिती शेअर नाही केली तरी असे प्रकार घडणार नाहीत. सध्या सायबर यंत्रणेकडे दररोज तीन ते चार तरी अशा प्रकारची तक्रारी येतात. यासाठी खबरदारी घ्यावी.

- विसेंद्र बायस, पोलीस उपनिरीक्षक

-----