शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

दरोडेखोरांचा हैदोस; सोलापूरकर भयभीत

By admin | Updated: April 3, 2017 14:36 IST

.

अमित सोमवंशीसोलापूर दि ३ : शहरात गेल्या आठ दिवसांपासून दरोडेखोरांनी हैदोस माजवला असून, त्यांंना आळा घालण्यात पोलीस खाते हतबल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याशिवाय घरफोड्यांचे सत्र सुरुच असून, रात्री गस्तही कुचकामी ठरत असल्याचे शहरवासिय भयभीत झाले आहेत. निर्ढावलेल्या चोरट्यांचा बंदोबस्त करुन दिलासा द्यावा, अशी मागणी शहरवासियांमधून जोर धरु लागली आहे.बुधवारी २९ एप्रिल रोजी बसवेश्वर तांड्यावर पाच जणांच्या अज्ञात टोळीने संगमेश्वर कोरे यांच्या घरात घुसून ठार मारण्याची धमकी देऊन २ लाख ५० हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटला. याच दरोडेखोरांनी तांड्यावरील आणखी तिघांच्या घरात घुसून तेथील ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजस्वनगरात बापलेकीला मारहाण करुन ३३ हजार रुपयांचा ऐवज लुटला तर दुसरी घटना सूर्यप्रकाश नगरात घडली. अशा घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत़बसवेश्वर तांड्यावर पाच जणांच्या टोळीने संगमेश्वर काशिनाथ कोरे यांच्या घरी दरोडा टाकून १० तोळे सोने आणि १२ हजार ७०० रुपये रोकड पळवून नेली. याच तांड्यावरील धर्माबाई धोंडिराम राठोड यांच्या घरातून दोन तोळे सोने, दोन हजार रुपये, लक्ष्मण भीमा चव्हाण यांच्या घरातील ६ हजार ५०० रुपयांचा एक मोबाईल चोरला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच दरोडेखोरांनी राजस्वनगरात बापलेकीला मारहाण करुन ३३ हजार रुपयांचा ऐवज लुटला तर दुसरी घटना सूर्यप्रकाश नगरात घडली. येथेही दोघांना मारहाण करीत दरोडेखोरांनी २० हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. दोन्ही दरोड्यात एकूण ५३ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणांचा तपास अद्याप लागलेला नाही. दागिने चोरीतून अधिक पैसे मिळत असल्याने चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढलेले असताना आता चोरट्यांनी मोबाईल चोरण्याकडे मोर्चा वळविला आहे. घरफोड्यांचे सत्रही थांबायला तयार नाही. अशा स्थितीत शहरवासियांना निर्भयपणे रात्रीची झोप घेणेही अवघड होऊन बसले आहे. -------------------पोलिसांची रात्री गस्त असते का?सोलापूर शहरात पोलिसांची रात्रगस्त असते, मात्र रात्र गस्तीच्या नावाखाली पोलीस नेमके कुठे फेरफटका मारतात हा संशोधनाचा विषय आहे. फिक्स पॉइंटवरही पोलीस दिसत नाहीत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून सहकुटुंब परगावी जाताना कोणीतरी घरामध्ये राहण्याची व्यवस्था करुनच जावे लागत आहे. पोलीस आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांचे जीवन सुसह्य करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.---------------------या ठिकाणी झाल्या चोऱ्या...१ एप्रिल रोजी हत्तुरे वस्तीत घराची भिंत फोडून दोन घरातील ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. च्बालाजीनगर झोपडपट्टीतील रहिवासी इस्माईल हबीब मुल्ला (वय ३६) यांचे घर फोडून चोरट्यांनी २० हजार ५०० रुपयांची रोकड चोरुन नेली. च्येथील कापड कारखानदाराने कामगारांच्या पगारासाठी आणलेली एक लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने दुचाकीवर येऊन हिसका मारुन पळविली. च्संजय गांधी नगरात १ एप्रिल रोजी सहिरा इमामअली सय्यद (वय ४८) यांचे घर फोडून चोरट्यांनी ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.च्एटीएम मशीनमधून पैसे काढून देतो, अशी बतावणी करुन चौघांची तब्बल ६५ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. या चारही घटना स्टेट बँक आॅफ इंडिया एटीएममध्ये घडल्या आहेत.