शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

स्वप्न बघू नका, ध्येय बघा: मेहेत्रे

By admin | Updated: June 6, 2014 01:14 IST

लोकमत अ‍ॅस्पायर : एज्युकेशन फेअरमध्ये ‘चला यशस्वी होऊ या’ यावर मार्गदर्शन

सोलापूर : पालकांकडून सातत्याने मुलांना ‘स्वप्न बघा’ असे सांगितले जाते़ स्वप्न बघू नका, ती पूर्ण होत नाहीत़ ध्येय बघा़, ते पूर्ण होईल, असे आवाहन सुपर अ‍ॅचिव्हर विवेक मेहेत्रे यांनी केले़ लोकमत युवा नेक्स्ट आयोजित ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१४’ मध्ये पहिल्या दिवशी ‘चला यशस्वी होऊ या’ या विषयावर मेहेत्रे यांचे व्याख्यान पार पडले़ यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना त्यांनी वरील आवाहन केले़ युवकांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी ९१० वेळा स्फूर्ती निर्माण करणारे आणि १६ वर्षे सह्याद्री वाहिनीवर तज्ज्ञांच्या मुलाखती घेणारे मेहेत्रे यांनी माणसांमध्ये दडलेली निराशा, प्रत्येकाला मिळालेली बुद्धिमत्ता, तिचा वापर करुन कसा विकास साधू शकतो, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत व्याख्यानातून स्फूर्ती दिली़ आलेल्या संकटावर मात करीत जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या स्लाईड शोद्वारे माहिती देऊन त्यांनी युवकांमधील स्फुलिंग चेतावले.ते म्हणाले की, जीवनात लहानापासूनच ‘नाही’ हा शब्द शिकविला जातो. यामुळे मुलं १७ वर्षांची झाली तरी नाही म्हणत निराश होताना दिसून येतात. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ‘नाही’ हा शब्द फेकून द्या. आलेली संकटे झेला. आपल्याला काय व्हायचे आहे, याचा विचार करुन झेप घ्या, असे सांगून जीवनात यशस्वी होण्याचे १३ नियम त्यांनी विशद केले.यानंतर मेहेत्रे यांना विद्यार्थी, पालकांनी प्रश्न विचारुन यशाची गुपिते जाणून घेतली़ तब्बल १ तास १० मिनिटे मेहेत्रे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करुन खुर्चीला खिळवून टाकले. -----------------------------------विवेक मेहेत्रे म्हणाले...वयाची ४०-४५ शी गाठलेली व्यक्ती नोकरीचा राजीनामा देतो म्हणतोय़ माणसं खचून चालली आहेत़दुसर्‍याची रेषा बारीक करुन स्वत:ची रेषा मोठी करू शकत नाही़इथली मुलं आत्मविश्वास हरवली आहेत, परिणामत: बाहेरच्या राज्यातील अल्पशिक्षित मुलं महाराष्ट्रात भवितव्य घडवित आहेत़केवळ पुस्तक वाचून यशस्वी होता येत नाही़ या जगात यशाचे नियम आहेत़ नवे बदल स्वीकारा, ‘नाही’ हा शब्द आपल्या मानसिकतेतून काढून टाकापैसा मिळविणे वाईट नाही, पण चांगल्या मार्गाने कमवा़कोणतेही यश हे समाज, जात, पार्श्वभूमी आणि पैशावर लाभत नाही़ प्रयत्नांचीच गरज आहे़ प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करता येते़आयुष्यात फालतुगिरी आणि फालतुगिरी करणार्‍या माणसांपासून दूर राहिल्यास पुढे जाल़ मनातला नकारार्थी शब्द काढून टाका़