शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करा, २५ लाखांचा निधी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST

बार्शी : तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत म्हटले की वादविवाद, तंटे होतात. भावकीत सुद्धा वैरत्व निर्माण होते. ...

बार्शी : तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत म्हटले की वादविवाद, तंटे होतात. भावकीत सुद्धा वैरत्व निर्माण होते. गावचा विकास आणि एकोपा यासाठी बार्शी तालुक्यात जास्तीत जास्त गावांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध कराव्यात, बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांसाठी १० लाख, २० लाख व २५ लाखांचा आमदार निधी लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याची घोषणा आमदार राजेंद्र राऊत यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, दहा-बारा दिवसांपासून बिनविरोध ग्रामपंचायती करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतेही राजकारण न आणता सर्वांना भेटून बिनविरोधासाठी चर्चा करतोय. सर्वांनी वाद टाळून एकत्र येण्याचा प्रयत्न करावा. यापैकी १५ ते २० गावे बिनविरोध होतील, असा विश्वास आहे. दोन हजार मतदारसंख्येच्या आतील ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर दहा लाख, चार हजारांच्या आतील गावासाठी २० लाख आणि चार हजारांपेक्षा जास्त मतदार असलेल्या गावांना २५ लाख रुपये आमदार निधी विकासकामांसाठी देऊ. कोरोनाचे संकट आहे. अर्थव्यवस्था मंदावली आहे. अशा काळात निवडणुकीचा खर्च परवडणारा नाही. कोणतेही राजकारण न पाहता, केंद्र व राज्य शासनाच्या जास्तीत जास्त योजना गावात राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्या गावातील लोकांनी माझ्याकडे पाठपुरावा करावा. कोणतेही राजकारण, गटतट असा विचार मनात न आणता एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून या सर्वांना सहकार्य करणार असल्याचे राऊत म्हणाले.

---

वैरागकरांच्या निर्णयाचे स्वागत

वैरागच्या सर्वपक्षीय नेत्यांनी अर्ज न दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आमदार राऊत यांनी स्वागत केले आहे. राऊत म्हणाले, सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बोललो आहे. आता ग्रामपंचायत व नंतर नगरपंचायत असा दुहेरी खर्च परवडणारा नाही.