शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

वनविभागातर्फे शेतकऱ्यांना सेंद्रीय खत व अवजारांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:29 IST

यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी प्रास्ताविकात ...

यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी प्रास्ताविकात कार्यकमाचा उद्देश व शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती दिली. नगराळे यांनी शेतीची सुपीकता अबाधित ठेऊन उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे शेती व शेतकऱ्यांसाठी हिताचे असून रासायनिक खतांच्या दुष्परिणामाचे संकट टाळता येऊ शकेल, असे मत व्यक्त केले.

तसेच वनांना आग लागण्याच्या घटना घडू नयेत यासाठी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहनही केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गणेश करे-पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून शेतीमध्ये आधुनिकतेचा व नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. चिकित्सक व प्रयोगशील शेतकरी बनून आपली प्रगती साधली.

टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी वन विभागाला आपले पूर्ण सहकार्य राहील असे स्पष्ट करून, संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपण, वन्यजीवांसाठी टँकरने पाणी व्यवस्था व अन्य सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणातून प्रमोद झिंजाडे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षिमित्र कल्याणराव साळुंके यांनी तर वनरक्षक गणेश झिरपे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी वन विभागाचे वनपाल दीपाली शिंदे, वनपाल कांतीलाल चेंडगे,वनरक्षक इरफान काझी, वनरक्षक गणेश झिरपे, संभाजी होनप, राजेंद्र जगताप, आर.बी. शेख, पी. डी. गाडे, आर. जी. रेगुडे, एल. बी. गाडे, एस. पी. कांडेकर, एम. टी.शेख, जगन्नाथ शिंदे, बालाजी शिंदे, सातव, पवळ व लाभार्थी शेतकरी तसेच टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

फोटो : २६करमाळा-अवजारे

वनविभागा तर्फे शेतकऱ्यांना शेतीपूरक औजाराचे व खताच्या वाटप प्रसंगी मान्यवर.

----