शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

वनविभागातर्फे शेतकऱ्यांना सेंद्रीय खत व अवजारांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:29 IST

यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी प्रास्ताविकात ...

यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी प्रास्ताविकात कार्यकमाचा उद्देश व शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती दिली. नगराळे यांनी शेतीची सुपीकता अबाधित ठेऊन उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे शेती व शेतकऱ्यांसाठी हिताचे असून रासायनिक खतांच्या दुष्परिणामाचे संकट टाळता येऊ शकेल, असे मत व्यक्त केले.

तसेच वनांना आग लागण्याच्या घटना घडू नयेत यासाठी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहनही केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गणेश करे-पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून शेतीमध्ये आधुनिकतेचा व नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. चिकित्सक व प्रयोगशील शेतकरी बनून आपली प्रगती साधली.

टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी वन विभागाला आपले पूर्ण सहकार्य राहील असे स्पष्ट करून, संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपण, वन्यजीवांसाठी टँकरने पाणी व्यवस्था व अन्य सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणातून प्रमोद झिंजाडे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षिमित्र कल्याणराव साळुंके यांनी तर वनरक्षक गणेश झिरपे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी वन विभागाचे वनपाल दीपाली शिंदे, वनपाल कांतीलाल चेंडगे,वनरक्षक इरफान काझी, वनरक्षक गणेश झिरपे, संभाजी होनप, राजेंद्र जगताप, आर.बी. शेख, पी. डी. गाडे, आर. जी. रेगुडे, एल. बी. गाडे, एस. पी. कांडेकर, एम. टी.शेख, जगन्नाथ शिंदे, बालाजी शिंदे, सातव, पवळ व लाभार्थी शेतकरी तसेच टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

फोटो : २६करमाळा-अवजारे

वनविभागा तर्फे शेतकऱ्यांना शेतीपूरक औजाराचे व खताच्या वाटप प्रसंगी मान्यवर.

----