शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

शेतीपंप वीजबिल वसुलीसाठी नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा ...

वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा नदीकाठ व बोअरवरील सर्व कृषिपंप सध्या बंद आहेत. सध्या ऊस लागवड हंगाम व कांदा लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उसाचे बेणे अंथरून ठेवले आहे. मात्र कृषिपंप बंद असल्याने शेतात अंथरलेले उसाचे बेणे वाळून जात असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा लागवड हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप विकत घेऊन ठेवले आहे. मात्र वाफ्यात पाणीच नाही, तर रोप कसे लावायचे? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

वीज वितरणने कुठलेही लेखी परिपत्रक न काढता वीजबिल वसुली चालू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मार्च-एप्रिल महिन्यात काही रक्कम वीज बिलापोटी भरली आहे. पुन्हा वीज बिलापोटी रक्कम भरावी, असा आग्रह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा आहे. ऊसबिले अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यातच वीज वितरणने वीज उपकेंद्रामधूनच वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना मानसिक धक्का दिला आहे.

कोट :::::::::::::::

कारखान्यांनी ऊस बिलाची एफआरपीची पूर्ण रक्कम न दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली करीत आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.

- युवराज घुले

जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोट :::::::::::::::::::::

शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा बंद केला आहे. वसुलीसाठी वरून आम्हाला प्रेशर आहे. वसुली न केल्यास कारवाई होत आहे. शेतकऱ्यांनी पूर्वी पाच हजार रुपये भरले असल्यास आणखी पाच हजार रुपये भरावेत. ज्या शेतकऱ्यांनी काहीच भरले नसल्यास त्यांनी दहा हजार रुपये भरावेत. सर्व शेतकरी बागायतदार असल्यामुळे थकित बिले भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे.

- भगवान अलदर,

कनिष्ठ अभियंता, वीज वितरण ग्रामीण विभाग

ओळी :::::::::::::::::::::::::

वीजपुरवठा खंडित केल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांनी अंथरलेल्या उसाच्या कांड्या वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

200821\img-20210819-wa0030.jpg

विज पुरवठा खंडीत केल्याने पाण्याअभावी शेतकर्‍यांनी अंथरलेल्या ऊसाच्या कांडया वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.