शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंप वीजबिल वसुलीसाठी नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा ...

वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा नदीकाठ व बोअरवरील सर्व कृषिपंप सध्या बंद आहेत. सध्या ऊस लागवड हंगाम व कांदा लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उसाचे बेणे अंथरून ठेवले आहे. मात्र कृषिपंप बंद असल्याने शेतात अंथरलेले उसाचे बेणे वाळून जात असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा लागवड हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप विकत घेऊन ठेवले आहे. मात्र वाफ्यात पाणीच नाही, तर रोप कसे लावायचे? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

वीज वितरणने कुठलेही लेखी परिपत्रक न काढता वीजबिल वसुली चालू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मार्च-एप्रिल महिन्यात काही रक्कम वीज बिलापोटी भरली आहे. पुन्हा वीज बिलापोटी रक्कम भरावी, असा आग्रह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा आहे. ऊसबिले अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यातच वीज वितरणने वीज उपकेंद्रामधूनच वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना मानसिक धक्का दिला आहे.

कोट :::::::::::::::

कारखान्यांनी ऊस बिलाची एफआरपीची पूर्ण रक्कम न दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली करीत आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.

- युवराज घुले

जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोट :::::::::::::::::::::

शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा बंद केला आहे. वसुलीसाठी वरून आम्हाला प्रेशर आहे. वसुली न केल्यास कारवाई होत आहे. शेतकऱ्यांनी पूर्वी पाच हजार रुपये भरले असल्यास आणखी पाच हजार रुपये भरावेत. ज्या शेतकऱ्यांनी काहीच भरले नसल्यास त्यांनी दहा हजार रुपये भरावेत. सर्व शेतकरी बागायतदार असल्यामुळे थकित बिले भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे.

- भगवान अलदर,

कनिष्ठ अभियंता, वीज वितरण ग्रामीण विभाग

ओळी :::::::::::::::::::::::::

वीजपुरवठा खंडित केल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांनी अंथरलेल्या उसाच्या कांड्या वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

200821\img-20210819-wa0030.jpg

विज पुरवठा खंडीत केल्याने पाण्याअभावी शेतकर्‍यांनी अंथरलेल्या ऊसाच्या कांडया वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.