शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंप वीजबिल वसुलीसाठी नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा ...

वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा नदीकाठ व बोअरवरील सर्व कृषिपंप सध्या बंद आहेत. सध्या ऊस लागवड हंगाम व कांदा लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उसाचे बेणे अंथरून ठेवले आहे. मात्र कृषिपंप बंद असल्याने शेतात अंथरलेले उसाचे बेणे वाळून जात असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा लागवड हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप विकत घेऊन ठेवले आहे. मात्र वाफ्यात पाणीच नाही, तर रोप कसे लावायचे? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

वीज वितरणने कुठलेही लेखी परिपत्रक न काढता वीजबिल वसुली चालू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मार्च-एप्रिल महिन्यात काही रक्कम वीज बिलापोटी भरली आहे. पुन्हा वीज बिलापोटी रक्कम भरावी, असा आग्रह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा आहे. ऊसबिले अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यातच वीज वितरणने वीज उपकेंद्रामधूनच वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना मानसिक धक्का दिला आहे.

कोट :::::::::::::::

कारखान्यांनी ऊस बिलाची एफआरपीची पूर्ण रक्कम न दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली करीत आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.

- युवराज घुले

जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोट :::::::::::::::::::::

शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा बंद केला आहे. वसुलीसाठी वरून आम्हाला प्रेशर आहे. वसुली न केल्यास कारवाई होत आहे. शेतकऱ्यांनी पूर्वी पाच हजार रुपये भरले असल्यास आणखी पाच हजार रुपये भरावेत. ज्या शेतकऱ्यांनी काहीच भरले नसल्यास त्यांनी दहा हजार रुपये भरावेत. सर्व शेतकरी बागायतदार असल्यामुळे थकित बिले भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे.

- भगवान अलदर,

कनिष्ठ अभियंता, वीज वितरण ग्रामीण विभाग

ओळी :::::::::::::::::::::::::

वीजपुरवठा खंडित केल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांनी अंथरलेल्या उसाच्या कांड्या वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

200821\img-20210819-wa0030.jpg

विज पुरवठा खंडीत केल्याने पाण्याअभावी शेतकर्‍यांनी अंथरलेल्या ऊसाच्या कांडया वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.