शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

भंडारकवठेच्या सरपंचाची अपात्रता कायम; राज्य निवडणूक आयोगाचा निकाल

By विलास जळकोटकर | Updated: August 16, 2023 18:43 IST

सदर आदेशास कोटगोंडे व कुगणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विशेष अर्ज दाखल करून जिल्ह्यधिकारी यांच्या निर्णयास आव्हान दिले होते.

सोलापूर - भंडारकवठे ग्रामपंचायत येथील सरपंचाने निवडणूक जमा-खर्च सादर केला नाही म्हणून माजी सरपंच रमेश गोविंद पाटील यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर प्रथमदर्शनी प्रतिज्ञापत्र व बँक खात्यामार्फत निवडणूक खर्च न केल्याची टिप्पणी करून सरपंच चिदानंद कोटगोंडे व सिद्धेश्वर कुणगे यांचे सदस्यत्व रद्द करून पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र केले होते. त्या निर्णयावरील आव्हानास सुनावणीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सरपंचाची अपात्रता कायम केल्याचा निकाल दिल्याचे ॲड. मंजूनाथ कक्कळमेली यांनी स्पष्ट केले.

सदर आदेशास कोटगोंडे व कुगणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विशेष अर्ज दाखल करून जिल्ह्यधिकारी यांच्या निर्णयास आव्हान दिले होते. त्याकामी मूळ तक्रारदाराकडून ॲड. मंजूनाथ कक्कलमेली यांनी हजर राहून युक्तिवाद केला. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय हा ग्रामपंचायत कायदा कलम १४ (२) अंतर्गत पारित झालेला आहे. त्या कलमान्वये राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई राज्य निवडणूक आयोगाच्या क्षमतेमध्ये ग्रामपंचायत कलम १४ (२) अंतर्गत केलेली आहे.

त्यामुळे परत त्याच कलमाखाली अपात्रतेची शिक्षा कमी करता येत नाही, या युक्तिवादावर राज्य निवडणूक आयोगाने सरपंच चिदानंद कोटगोंडे व सिद्धेश्वर कुगणे यांचे राहिलेल्या कालावधीसाठी म्हणजे पुढील तीन वर्षांसाठी किंवा पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांचे सदस्यत्व रद्द केले. यात सरपंचाकडून ॲड. आशिष गायकवाड यांनी, तर मूळ तक्रारदाराकडून ॲड. मंजूनाथ कक्कलमेली व ॲड. गुरू बिराजदार यांनी काम पाहिले.