शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नगररचना विकास आराखड्यावर चर्चा

By admin | Updated: June 10, 2014 00:29 IST

माळशिरस तालुका: नऊ गावांमध्ये अडचणी दूर करण्याचा प्रयत्न

अकलूज : अकलूजसह इतर नऊ गावांसाठी शासनाने तयार केलेल्या नगररचना विकास आराखड्यामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याने व त्यास ग्रामस्थांनी तक्रारी देऊन घेतलेल्या हरकतींमुळे, आराखडा रद्द होऊन नवीन नगररचना विकास आराखडा तयार करण्याबाबत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नगरविकास मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.शासनाच्या नगरविकास विभागाने अकलूजसह यशवंतनगर, संग्रामनगर, माळीनगर, सवतगव्हाण, चौंडेश्वरवाडी, बागेवाडी, आनंदनगर, माळेवाडी (अ.) या नऊ गावांसाठी नवीन नगररचना आराखडा प्रसिध्द केला होता.आॅक्टोबर २०१३ मध्ये हा आराखडा प्रत्येक गावामध्ये प्रसिध्द झाल्यानंतर या सर्व नऊ गावांतील ग्रामस्थांची नाराजी व शासनाकडून काही आरक्षित जागा, रस्ते निवडताना झालेल्या तांत्रिक चुका दुरूस्त करून ग्रामस्थांच्या सायीचा नव्याने नगरविकास आराखडा तयार करावा, अशी मागणी सर्वच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे केली होती.त्याबाबत आॅक्टोबर २०१३ मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केला होता. या ठरावाच्या प्रति खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंतराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली उदय सामंत यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.उदय सामंत यांनी तत्काळ हा आराखडा रद्द करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार व तांत्रिक चुका दुरूस्त करून नव्याने नगरविकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंत डोळस, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, मोहनराव लोंढे, नऊ गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. ----------------------------या आहेत तांत्रिक चुकामागील नगरविकास आराखड्यातील महत्त्वाच्या त्रुटी, नियोजन प्रमाणांकानुसार आरक्षणे प्रस्तावित करण्यात आलेली नाहीत. ती जास्तीची दर्शविण्यात आलेली आहेत, शहरातील समांतर रस्ते खूप कमी अंतरावर दर्शविलेले आहेत, ईदगाहसारख्या प्रार्थना स्थळावरून रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे, हनुमान मंदिराच्या जवळ कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आलेला आहे. अशा तांत्रिक चुकांमुळे सामाजिक सलोखा नष्ट होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे तोडगा काढण्यासाठी खा. मोहिते—पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील नवीन नगरविकास आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे.