शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गोकुळ शुगर्सच्या चेअरमनची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:25 IST

भगवान शिंदे हे सकाळी कोणालाही न सांगता नाईटड्रेसवर पहाटे ५.३० वाजता घराबाहेर पडले. ते कधी फिरायला जात नव्हते. त्यामुळे ...

भगवान शिंदे हे सकाळी कोणालाही न सांगता नाईटड्रेसवर पहाटे ५.३० वाजता घराबाहेर पडले. ते कधी फिरायला जात नव्हते. त्यामुळे सकाळपासून घरात नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परंतु थांगपत्ता लागत नव्हता. स्वतःचा मोबाईल पाकीट ओळखपत्र सर्वकाही घरीच ठेवले होते.

मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रेल्वे रुळावर एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देहाचे दोन तुकडे झाले होते. ओळख पटण्यासारखी एकही खूण अथवा कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते. पोलिसांनी तातडीने त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये हलवले मृत असल्याचे सांगताच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनगृहात त्यांचा मृतदेह ठेवला.

दरम्यान कुटुंबीय बाहेर पडले कुठे अपघात झाला आहे का धर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव अशा ठिकाणीही त्यांनी शोध सुरू केला. पत्नी उषा शिंदे यांनी सोलापुरातील विवाहित मुलगी स्मिता नायडू हिला झाल्या प्रकाराची माहिती देऊन वडील कुठे गेलेत याबाबत शोध घेत असल्याचे सांगितले. मुलगी आणि जावई तातडीने बाहेर पडले. चौकशी करत ते शासकीय रुग्णालयात आले तेथे एक बेवारस प्रेत आत्ताच दाखल झाल्याचे कळले. आत जाऊन पाहताच तो मृतदेह भगवान शिंदे यांचाच असल्याची खात्री पटली. त्यानंतर दहिटणे ता. अक्कलकोट येथे त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, बलभीम, गोकुळ, गणपत असे तीन भाऊ, पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

अशी झाली जडणघडण

बलभीम शिंदे, भगवान शिंदे यांनी ४५ वर्षांपूर्वी लकी चौकात गोकुळ लॉटरीचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. कष्टातून आणि जिद्दीने या व्यवसायात त्यांनी जम बसवला. शेती आणि लॉटरी व्यवसायातून जमलेल्या रकमेतून त्यांनी रुद्वेवाडी येथे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत भागीदारीत मातोश्री लक्ष्मी शुगरची उभारणी केली. काही वर्षांतच धोत्री (ता. द. सोलापूर) येथे गोकुळ शुगर्सची उभारणी केली. अलीकडे त्यांनी गावडीदारफळ येथे नवीन कारखान्यासाठी जमीन खरेदी केली होती.

आर्थिक विवंचना असल्याचे कारण

गोकुळ शुगर्स हा साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले देण्याइतकी रक्कमही देता आली नव्हती. त्यामुळे त्यांना गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, या दरम्यान त्यांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत होता. आर्थिक विवंचनेने ते तणावाखाली असावेत, अशी चर्चा होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत

अडचण दूर झाली असताना असे का घडले?

गोकुळ शुगर्स कारखान्यासाठी बँकांमधून कर्ज प्रकरण मंजूर होत नव्हते, मात्र सहा महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर एका सहकारी बँकेने कारखान्याला कर्ज देऊ केले. त्यामुळे कारखान्याची आर्थिक अडचण दूर झाली होती. चार दिवसापूर्वी बँकेने रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा ही केली. अडचण दूर झाली असताना त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांनाही पडला आहे.