शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

गोकुळ शुगर्सच्या चेअरमनची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:25 IST

भगवान शिंदे हे सकाळी कोणालाही न सांगता नाईटड्रेसवर पहाटे ५.३० वाजता घराबाहेर पडले. ते कधी फिरायला जात नव्हते. त्यामुळे ...

भगवान शिंदे हे सकाळी कोणालाही न सांगता नाईटड्रेसवर पहाटे ५.३० वाजता घराबाहेर पडले. ते कधी फिरायला जात नव्हते. त्यामुळे सकाळपासून घरात नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परंतु थांगपत्ता लागत नव्हता. स्वतःचा मोबाईल पाकीट ओळखपत्र सर्वकाही घरीच ठेवले होते.

मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रेल्वे रुळावर एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देहाचे दोन तुकडे झाले होते. ओळख पटण्यासारखी एकही खूण अथवा कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते. पोलिसांनी तातडीने त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये हलवले मृत असल्याचे सांगताच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनगृहात त्यांचा मृतदेह ठेवला.

दरम्यान कुटुंबीय बाहेर पडले कुठे अपघात झाला आहे का धर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव अशा ठिकाणीही त्यांनी शोध सुरू केला. पत्नी उषा शिंदे यांनी सोलापुरातील विवाहित मुलगी स्मिता नायडू हिला झाल्या प्रकाराची माहिती देऊन वडील कुठे गेलेत याबाबत शोध घेत असल्याचे सांगितले. मुलगी आणि जावई तातडीने बाहेर पडले. चौकशी करत ते शासकीय रुग्णालयात आले तेथे एक बेवारस प्रेत आत्ताच दाखल झाल्याचे कळले. आत जाऊन पाहताच तो मृतदेह भगवान शिंदे यांचाच असल्याची खात्री पटली. त्यानंतर दहिटणे ता. अक्कलकोट येथे त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, बलभीम, गोकुळ, गणपत असे तीन भाऊ, पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

अशी झाली जडणघडण

बलभीम शिंदे, भगवान शिंदे यांनी ४५ वर्षांपूर्वी लकी चौकात गोकुळ लॉटरीचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. कष्टातून आणि जिद्दीने या व्यवसायात त्यांनी जम बसवला. शेती आणि लॉटरी व्यवसायातून जमलेल्या रकमेतून त्यांनी रुद्वेवाडी येथे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत भागीदारीत मातोश्री लक्ष्मी शुगरची उभारणी केली. काही वर्षांतच धोत्री (ता. द. सोलापूर) येथे गोकुळ शुगर्सची उभारणी केली. अलीकडे त्यांनी गावडीदारफळ येथे नवीन कारखान्यासाठी जमीन खरेदी केली होती.

आर्थिक विवंचना असल्याचे कारण

गोकुळ शुगर्स हा साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले देण्याइतकी रक्कमही देता आली नव्हती. त्यामुळे त्यांना गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, या दरम्यान त्यांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत होता. आर्थिक विवंचनेने ते तणावाखाली असावेत, अशी चर्चा होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत

अडचण दूर झाली असताना असे का घडले?

गोकुळ शुगर्स कारखान्यासाठी बँकांमधून कर्ज प्रकरण मंजूर होत नव्हते, मात्र सहा महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर एका सहकारी बँकेने कारखान्याला कर्ज देऊ केले. त्यामुळे कारखान्याची आर्थिक अडचण दूर झाली होती. चार दिवसापूर्वी बँकेने रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा ही केली. अडचण दूर झाली असताना त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांनाही पडला आहे.