शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विवेकी, संयमी, विनयशील नेतृत्व : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:27 IST

चातुर्वर्ण्य पद्धतीत तळाच्या समाजात जन्म घेणारा, जन्मजात अन्याय सहन करणारा, व्यवस्थेच्या विषमपणात होरपळून निघालेला लहानपणापासून पदोपदी अडथळे, अडचणीचे, ...

चातुर्वर्ण्य पद्धतीत तळाच्या समाजात जन्म घेणारा, जन्मजात अन्याय सहन करणारा, व्यवस्थेच्या विषमपणात होरपळून निघालेला लहानपणापासून पदोपदी अडथळे, अडचणीचे, उपेक्षितांचे जीवन जगणारा माणूस स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा, प्रतिकूल परिस्थितीत उभे राहून स्वत:चा प्रकाश पाडणारा, समाजामध्ये स्वत:चा एक प्रवाह निर्माण करणारा माणूसच स्वत:साठी, समाजासाठी, जन्मभूमी, कर्मभूमीसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माणसाची गणना एक सुज्ञ, अभ्यासू, संयमी, विनयशील, विकसनशील, परिवर्तनशील मानव समाजहित, राष्ट्रहित जपणाऱ्या आदर्श व्यक्तींमध्ये होते.

माणसाच्या विकासासाठी शैक्षणिक पात्रता, मानसिक, बौद्धिक क्षमतेचा विकास होणे महत्त्वाचे असते. या गोष्टींचा वापर करून मनुष्य कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा विकास करतो.

उपेक्षित समाजात जन्म घेतलेल्या व्यक्तीवर समाजाच्या वागण्याचा विपरीत परिणाम होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत जगतो, वाढतो आणि हेच माझं नशीब, कर्म समजतो व त्यातच जगतो, मरतो. परंतु काही व्यक्ती या विपरीत परिस्थितीमध्ये स्वत:ला विकसित करून समाजात, देशात, जगात आपल्या परीने आपल्या जीवनाच्या प्रवासाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून सिद्ध होतात व इतरांच्या विकासाचे प्रेरणास्थान होतात. अशीच एक व्यक्ती सोलापुरात, भारत देशात जन्म घेऊन मानव उत्क्रांतच्या विकासाचा एक उत्तम उदाहरण म्हणून स्वत:चे वलय जागतिक पातळीवर निर्माण केले आहे. त्या वलयाचे नाव सुशीलकुमार शिंदे होय.

- अरुण शर्मा

कार्याध्यक्ष, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी