शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

व्यापाऱ्यांशी थेट संपर्क अन्‌ किसान रेल्वे मदतीनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नासीर कबीर करमाळा :शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांचा पेरू दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. गटशेती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नासीर कबीर

करमाळा :शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांचा पेरू दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. गटशेती माध्यमातून घेतलेल्या फळाचे किसान रेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत बोलबाला वाढला आहे. थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यामुळे शेतकऱ्यांना भावही चांगला मिळू लागला आहे.

करमाळा तालुक्यात शेटफळ येथील तरुण शेतकरी पाच वर्षांपासून केळी व पेरुचे फळ पीक घेत आहे. निर्यातक्षम केळी बरोबरच प्रायोगिक तत्त्वावर प्रगतिशील शेतकरी विजय लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एन. आर. जातींच्या पेरूची लागवड केली आहे.

गट शेतीच्या माध्यमातून येथील विजय लबडे, नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर यांनी शेतात सुरुवातीला व्ही. एन. आर. पेरुची लागवड केली.

पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट पेरु शेती करणाऱ्यांना त्यांच्या शेतीला भेटी देऊन या पिकातील बारकावे समजून घेतले.

एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन घेतले. परंतू पुणे, मुंबई, हैदराबाद या बाजारपेठेत चांगला दर मिळत नव्हता. किसानरेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत २५ तासांच्या कालावधीत माल पोहोचू लागला. मालाचा दर्जा चांगला असल्याने दरही चांगला मिळू लागला. पेरुचे उत्तम प्रकारे ग्रेडिंग पॅकिंग व दहा किलो वजनाच्या बॉक्स मध्ये शेतकरी दिल्ली बाजारपेठेत माल पाठवला जात आहे. दिल्लीच्या व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे. रेल्वे विभागाकडून किसान रेल्वे सुविधा सुरू झाल्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत झाली आहे.

----

गटशेतीच्या माध्यमातून पेरु पीक निवडले. भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. परंतू सुरुवातीला बाजारपेठेची अडचण होती. किसान रेल्वे सुविधेमुळे ती दूर झाली आहे. शेटफळ परिसरातील शेतकऱ्यांचा माल जेऊर येथून पाठविला जात होता. परंतु रेल्वेने जेऊर येथील लोडिंग बंद केल्यामुळे कुर्डुवाडी येथे माल घेऊन जावा लागत आहे. जेऊर येथील सुविधा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.

- विजय लबडे

पेरू उत्पादक,

शेटफळ, ता.करमाळा

---

थेट दिल्ली बाजारपेठ

कृषिरत्न आनंद कोठडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कंदर येथील किरण डोके यांच्या सहकार्याने दिल्ली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क झाला. माल थेट पाठविणे शक्य झाले. यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर मिळाला आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ३० एकर क्षेत्रावर हे फळपीक घेतले आहे. किसान रेल्वे सुविधेमुळे थेट दिल्ली बाजारपेठेत मार्केटिंग होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

----

फोटो : २३ करमाळा