शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांशी थेट संपर्क अन्‌ किसान रेल्वे मदतीनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नासीर कबीर करमाळा :शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांचा पेरू दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. गटशेती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नासीर कबीर

करमाळा :शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांचा पेरू दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. गटशेती माध्यमातून घेतलेल्या फळाचे किसान रेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत बोलबाला वाढला आहे. थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यामुळे शेतकऱ्यांना भावही चांगला मिळू लागला आहे.

करमाळा तालुक्यात शेटफळ येथील तरुण शेतकरी पाच वर्षांपासून केळी व पेरुचे फळ पीक घेत आहे. निर्यातक्षम केळी बरोबरच प्रायोगिक तत्त्वावर प्रगतिशील शेतकरी विजय लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एन. आर. जातींच्या पेरूची लागवड केली आहे.

गट शेतीच्या माध्यमातून येथील विजय लबडे, नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर यांनी शेतात सुरुवातीला व्ही. एन. आर. पेरुची लागवड केली.

पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट पेरु शेती करणाऱ्यांना त्यांच्या शेतीला भेटी देऊन या पिकातील बारकावे समजून घेतले.

एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन घेतले. परंतू पुणे, मुंबई, हैदराबाद या बाजारपेठेत चांगला दर मिळत नव्हता. किसानरेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत २५ तासांच्या कालावधीत माल पोहोचू लागला. मालाचा दर्जा चांगला असल्याने दरही चांगला मिळू लागला. पेरुचे उत्तम प्रकारे ग्रेडिंग पॅकिंग व दहा किलो वजनाच्या बॉक्स मध्ये शेतकरी दिल्ली बाजारपेठेत माल पाठवला जात आहे. दिल्लीच्या व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे. रेल्वे विभागाकडून किसान रेल्वे सुविधा सुरू झाल्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत झाली आहे.

----

गटशेतीच्या माध्यमातून पेरु पीक निवडले. भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. परंतू सुरुवातीला बाजारपेठेची अडचण होती. किसान रेल्वे सुविधेमुळे ती दूर झाली आहे. शेटफळ परिसरातील शेतकऱ्यांचा माल जेऊर येथून पाठविला जात होता. परंतु रेल्वेने जेऊर येथील लोडिंग बंद केल्यामुळे कुर्डुवाडी येथे माल घेऊन जावा लागत आहे. जेऊर येथील सुविधा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.

- विजय लबडे

पेरू उत्पादक,

शेटफळ, ता.करमाळा

---

थेट दिल्ली बाजारपेठ

कृषिरत्न आनंद कोठडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कंदर येथील किरण डोके यांच्या सहकार्याने दिल्ली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क झाला. माल थेट पाठविणे शक्य झाले. यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर मिळाला आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ३० एकर क्षेत्रावर हे फळपीक घेतले आहे. किसान रेल्वे सुविधेमुळे थेट दिल्ली बाजारपेठेत मार्केटिंग होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

----

फोटो : २३ करमाळा