शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

तीर्थक्षेत्र विकासाबरोबर कृषी विकासाची नवी पहाट होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST

भाग -२ लोकमत न्यूज नेटवर्क माळशिरस : लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. यामुळे रेल्वे मार्गाच्या स्वप्नांना उजाळा ...

भाग -२

लोकमत न्यूज नेटवर्क

माळशिरस : लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. यामुळे रेल्वे मार्गाच्या स्वप्नांना उजाळा मिळत आहे. या मार्गावरील रेल्वेमुळे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील नवा पट्टा विकसित होणार आहे. यात तीर्थक्षेत्र विकासाच्या संकल्पनेबरोबरच या पट्ट्यात कृषी विकासाची नवी पहाट होणार आहे. मात्र या बहुचर्चित रेल्वेसाठी आणखी किती पिढ्यांना प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्ग पालखी मार्गाला समांतर असल्याने पंढरपूरच्या वारीचा इतर मार्गावरचा ताण कमी होणार आहे. याशिवाय शिखर शिंगणापूरच्या चैत्री यात्रेसाठी भाविकांना वरदान ठरणार आहे. तसेच मार्गालगतच्या परिसरात डाळिंब व केळी अलीकडे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. याशिवाय दररोज शेकडो टन भाजीपाला पुणे व मुंबई या शहराकडे जातो आहे. या मार्गालगत रुजलेल्या साखर कारखानदारीमुळे रेल्वे शेतीसाठी मोठे वरदान ठरणार आहे. मात्र सध्या तरी या मार्गाकडे सर्वसामान्यांचे डोळे लागून आहेत.

जर-तरच्या रेल्वे प्रवासाची थट्टा

सध्या फलटण-पंढरपूर रेल्वेकडे एरंडाचं गुऱ्हाळ म्हणून पाहिलं जात आहे. तीन पिढ्यांनी या मार्गाचं रखडलेल स्वप्न पाहिल आहे. जुन्या सर्वे झालेल्या मार्गावर अनेक ठिकाणी वसाहती तयार झाल्या आहेत. याशिवाय सध्या सुरू असलेल्या नव्या सर्वेसाठी काही ठिकाणी विरोध केला जात आहे. यातच केंद्र व राज्य सरकारची टोलवाटोलवी, अशा अनेक गोष्टी जर उलगडल्या तरच या रेल्वेचे स्वप्न सत्यात येणार आहे. अन्यथा लोणंद-पंढरपूर रेल्वे हे एक स्वप्न ठरणार आहे.

कोट ::::::::::::::::

लोणंद-पंढरपूर हा प्रकल्प तीर्थक्षेत्र विकासाबरोबर औद्योगिकीकरण व कृषी क्षेत्रासाठी नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. हा मार्ग रखडल्यामुळे या पट्ट्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. यासाठी रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. या मार्गावर रेल्वे धावल्याशिवाय लढा थांबविला जाणार नाही.

- ॲड. सोमनाथ वाघमोडे

अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती