शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST

कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या ...

कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या कुठे विकायच्या हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या आठवडी बाजारावर अवलंबून असणारे छोट्या व्यावसायिकांचाही उदरनिर्वाह आठवडी बाजारावर अवलंबून आहे. तोही बदच आहे. आर्थिक घसरणीचा विचार करता आठवडा बाजारसह इतर बाजार सुरू करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, ग्रामीण भागातील आठवडी बाजारात शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे. बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची जनावरे आणि कोंबडी, अंडी यांचाही आठवडी बाजार बंद आहे. यांचा व्यापार करणारे शेतकरी व व्यापारी यांच्या शेतीमालाला व जनावरांना योग्य किंमत मिळत नाही. महागाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक राजकीय कार्यक्रम, लग्न, समारंभ, अनेक प्रकारचे व्यवसाय, दुकाने, सलून दुकाने, दारू दुकाने यांना परवानगी दिली आहे. मात्र, गेली दीड वर्षे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बस व रेल्वेसेवाही सुरू झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने ही सकाळी ७ ते ४ या वेळेत सुरू आहेत. ग्रामीण भागातील आठवडी बाजारा त्वरित सुरू करून छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.