शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST

कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या ...

कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या कुठे विकायच्या हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या आठवडी बाजारावर अवलंबून असणारे छोट्या व्यावसायिकांचाही उदरनिर्वाह आठवडी बाजारावर अवलंबून आहे. तोही बदच आहे. आर्थिक घसरणीचा विचार करता आठवडा बाजारसह इतर बाजार सुरू करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, ग्रामीण भागातील आठवडी बाजारात शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे. बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची जनावरे आणि कोंबडी, अंडी यांचाही आठवडी बाजार बंद आहे. यांचा व्यापार करणारे शेतकरी व व्यापारी यांच्या शेतीमालाला व जनावरांना योग्य किंमत मिळत नाही. महागाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक राजकीय कार्यक्रम, लग्न, समारंभ, अनेक प्रकारचे व्यवसाय, दुकाने, सलून दुकाने, दारू दुकाने यांना परवानगी दिली आहे. मात्र, गेली दीड वर्षे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बस व रेल्वेसेवाही सुरू झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने ही सकाळी ७ ते ४ या वेळेत सुरू आहेत. ग्रामीण भागातील आठवडी बाजारा त्वरित सुरू करून छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.