शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST

कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या ...

कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या कुठे विकायच्या हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या आठवडी बाजारावर अवलंबून असणारे छोट्या व्यावसायिकांचाही उदरनिर्वाह आठवडी बाजारावर अवलंबून आहे. तोही बदच आहे. आर्थिक घसरणीचा विचार करता आठवडा बाजारसह इतर बाजार सुरू करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, ग्रामीण भागातील आठवडी बाजारात शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे. बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची जनावरे आणि कोंबडी, अंडी यांचाही आठवडी बाजार बंद आहे. यांचा व्यापार करणारे शेतकरी व व्यापारी यांच्या शेतीमालाला व जनावरांना योग्य किंमत मिळत नाही. महागाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक राजकीय कार्यक्रम, लग्न, समारंभ, अनेक प्रकारचे व्यवसाय, दुकाने, सलून दुकाने, दारू दुकाने यांना परवानगी दिली आहे. मात्र, गेली दीड वर्षे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बस व रेल्वेसेवाही सुरू झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने ही सकाळी ७ ते ४ या वेळेत सुरू आहेत. ग्रामीण भागातील आठवडी बाजारा त्वरित सुरू करून छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.