शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठविण्याचा निर्णय

By admin | Updated: May 21, 2015 00:44 IST

खंडपीठ कृती समितीची बैठक : सहा जिल्ह्यांतील वकील उपस्थित

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना पत्र पाठवून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेली २८ वर्षे संघटितपणे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शासनाने ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत ‘सर्किट बेंच’चा ठराव केल्याबद्दल यावेळी मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य शिवाजीराव चव्हाण यांनी कृती समितीने आंदोलनाबाबत कोणताही निर्णय तूर्त न घेता मुख्य न्यायाधीशांना पत्र देऊन निर्णयाबाबत विचारणा करावी, असे सूचविले. त्यानुसार मुख्य न्यायाधीश शहा यांना त्वरीत पत्र पाठविण्याचा ठराव करण्यात आला.दरम्यान, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, संभाजीराव मोहिते (कराड), दिलीप नार्वेकर (सिंधुदुर्ग), किरण घाटगे (पंढरपूर), जी. एम. पाटील, बाळासाहेब शेळके, (माळशिरस) आदींनी सर्किट बेंच स्थापनेसाठी आम्ही ठामपणे कोल्हापूरचे बाजूने असल्याचे सांगितले. यावेळी के. ए. कापसे, शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, पी. आर. पाटील, प्रकाश मोरे (कोल्हापूर), डी. व्ही. पाटील (सातारा), श्रीकांत जाधव (सांगली), महादेवराव आडगुळे यांची भाषणे झाली. यावेळी हेमेंद्र गोवेकर (मालवण), विलास मगदूम (कागल), जयसिंगराव पाटील (माळशिरस), वीरेश नाईक (सिंधुदुर्ग), सुभाष देसाई (पंढरपूर), शशिकिरण पाटणे (सांगोला), महेंद्र कोरे (मिरज), डी. सी. जाधव (मंगळवेढा), शरद जाधव (सांगली), अजित मोहिते, धनंजय पठाडे, संपतराव पवार, पी. बी. आंबेकर, अतुल रेंदाळे (इचलकरंजी) आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.