शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:23 IST

तालुक्यात संचारबंदीला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी अक्कलकोट येथे किमान २५ बेडचे कोरोनावर ...

तालुक्यात संचारबंदीला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी अक्कलकोट येथे किमान २५ बेडचे कोरोनावर उपचार होणारे कोविड केअर सेंटर उभारणे आवश्यक आहे. तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६१७ रुग्ण संख्या झाली असून ७८ जणांना जीव गमवावा लागला आहे.

शहर व तालुक्यात भाजीपाला, किराणा, डेअरी, दवाखाना या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण फिरताना दिसतात. शिवाय हे लोक मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स हे नियम पाळले जात नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील लोक कोरोनाची लक्षणे असूनही बरेच वेळा अंगावर काढतात किंवा जवळील डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार घेतात. यात वेळ निघून जातो आणि आजार वाढल्यावर सोलापूर येथे उपचार घेण्यासाठी जाता. त्या ठिकाणी वेळेवर बेड मिळत नाही. मिळाले तरी महागडे उपचार खर्च परवडत नाही. यामुळे परिणामी जीव गमवावा लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

तज्ज्ञ डाॅक्टर, कर्मचाऱ्यांअभावी कोविड सेंटर नाही

कोरोनाच्या पहिल्या लॉटेत स्वामी समर्थ रुग्णालयात १० लाख रुपये खर्चून कोविड केअर सेंटर तयार केले आहे. मात्र, केवळ तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रशुद्ध कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत होऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा जाहिरात दिली. मात्र, त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी परिश्रम घेतले आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी

विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणे, शारीरिक आंतर न ठेवणे, अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. शिवाय जागेवर अँटिजन टेस्ट केल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील अनेकांकडे अद्याप तपासणी झालेली नाही. त्यांचीही तपासणी केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल.

एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू

एकाच दिवसात समर्थनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, बासलेगाव येथे ६६ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, गळोरगी येथील ६५ वर्षीय पुरुष, बावकरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.