शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:23 IST

तालुक्यात संचारबंदीला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी अक्कलकोट येथे किमान २५ बेडचे कोरोनावर ...

तालुक्यात संचारबंदीला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी अक्कलकोट येथे किमान २५ बेडचे कोरोनावर उपचार होणारे कोविड केअर सेंटर उभारणे आवश्यक आहे. तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६१७ रुग्ण संख्या झाली असून ७८ जणांना जीव गमवावा लागला आहे.

शहर व तालुक्यात भाजीपाला, किराणा, डेअरी, दवाखाना या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण फिरताना दिसतात. शिवाय हे लोक मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स हे नियम पाळले जात नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील लोक कोरोनाची लक्षणे असूनही बरेच वेळा अंगावर काढतात किंवा जवळील डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार घेतात. यात वेळ निघून जातो आणि आजार वाढल्यावर सोलापूर येथे उपचार घेण्यासाठी जाता. त्या ठिकाणी वेळेवर बेड मिळत नाही. मिळाले तरी महागडे उपचार खर्च परवडत नाही. यामुळे परिणामी जीव गमवावा लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

तज्ज्ञ डाॅक्टर, कर्मचाऱ्यांअभावी कोविड सेंटर नाही

कोरोनाच्या पहिल्या लॉटेत स्वामी समर्थ रुग्णालयात १० लाख रुपये खर्चून कोविड केअर सेंटर तयार केले आहे. मात्र, केवळ तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रशुद्ध कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत होऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा जाहिरात दिली. मात्र, त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी परिश्रम घेतले आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी

विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणे, शारीरिक आंतर न ठेवणे, अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. शिवाय जागेवर अँटिजन टेस्ट केल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील अनेकांकडे अद्याप तपासणी झालेली नाही. त्यांचीही तपासणी केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल.

एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू

एकाच दिवसात समर्थनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, बासलेगाव येथे ६६ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, गळोरगी येथील ६५ वर्षीय पुरुष, बावकरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.