शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

कोरोना तपासणीची सक्ती केली तरच धोका टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST

पहिल्या लाटेत एखादा रुग्ण सापडले की, तत्काळ त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करून तपासणी केले जात होती. ते आता होताना ...

पहिल्या लाटेत एखादा रुग्ण सापडले की, तत्काळ त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करून तपासणी केले जात होती. ते आता होताना दिसत नाही. सध्या लॉकडाऊनचा अंदाज घेऊन मुंबई, पुणे, बंगलोर अशा मोठ-मोठ्या शहरांमधून स्थलांतरित लोकांचा लोंढा मूळगावी परत येत आहेत. त्यांचीही तत्काळ तपासणी होण्याची मागणी होऊ लागली आहे.

-----

श्रीशैलहून परतलेल्या भाविकांची तपासणी करा

काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातून श्रीशैलला श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त हजारो भाविक गेलेले होते. ते सर्वजण मूळगावी परत आलेले आहेत. त्यामधून बरेचजण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. गावपातळीवर महिती संकलन करून तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता नागरिकांमधून होऊ लागली आहे.

२० एप्रिल रोजी १३० जणांचे तपासणी झाली असून, त्यापैकी १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांत अक्कलकोट शहरातून १८ जण ग्रामीणमधून १९ असे ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये श्रीशैल यात्रेसाठी जाऊन आलेल्यांची संख्या अधिक आहे.

-----

दुसऱ्या लाटेत ग्रामपंचायत, नगरपालिका व आरोग्य विभाग अशा प्रत्येकांनी आपापल्या स्तरावर कोरोना संशयित रुग्ण व त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करायची आहे. त्या पद्धतीने विभागणी करून दिली आहे. त्यानुसार कामकाज सुरू आहे. हे काम आणखी गतीने होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी