शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

टेंभूच्या पाण्यातून मेथवडेपर्यंतचे बंधारे भरून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST

सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत होता. आ. शहाजीबापू पाटील विजयी झाल्यानंतर इतिहासामध्ये प्रथमच ...

सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत होता. आ. शहाजीबापू पाटील विजयी झाल्यानंतर इतिहासामध्ये प्रथमच गेल्यावर्षी टेंभू योजनेचे पाणी उन्हाळी आवर्तनातून सांगोला तालुक्याला मिळाले. माण नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरीत्या गतवर्षीचे आवर्तन पूर्ण झाले. याहीवर्षी माण नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, असे लेखी पत्र देऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडून माण नदीत पाणी सोडण्याचे आदेश होते.

शेजारील गावांनाही फायदा होणार

टेंभू योजनेतून उन्हाळी आवर्तनाचे आटपाडी तलावातून ३५० क्युसेकने सोडलेल्या पाण्यातून माण नदीवरील बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासूद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे बंधारे भरल्यानंतर नजीकच्या गावांसह शेजारील अन्य गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. नीरा उजवा कालव्याचेही आवर्तन यशस्वीरीत्या चालू असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे आ. शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.