शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

" टू-फोर-डी " तणनाशकाने द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

बंदीची मागणी : पाचशे मीटरवरून बसते झळ लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : उसाच्या फडात किंवा मोकळ्या जमिनीतील तण मारण्यासाठी ...

बंदीची मागणी : पाचशे मीटरवरून बसते झळ

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : उसाच्या फडात किंवा मोकळ्या जमिनीतील तण मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या '' टू-फोर-डी '' या तणनाशकामुळे नजीकच्या द्राक्ष बागा आणि पपईच्या बागेचे नुकसान होते. त्यामुळे '' टू-फोर-डी '' या तणनाशकाच्या वापरावर शासनाने बंदी घालण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

द्राक्ष बागांवर तणनाशक मारण्याचे प्रकार वारंवार घडतात. तसेच बागांशेजारील उसाच्या फडात किंवा मोकळ्या जमिनीवरील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी '' टू-फोर-डी '' या जालीम तणनाशकाचा वापर करतात. त्यामुळे परिसरातील ५०० मीटर अंतरावर असलेल्या द्राक्ष बागांना त्याचा फटका बसतो. द्राक्षांच्या वेली आणि पपईची पाने या तणनाशकाने जळून जातात. त्यांची वाढ खुंटते. फुले आणि फळे झडून जातात. द्राक्ष बागांच्या पट्ट्यात हा प्रकार सर्रास घडत असतो. त्यातून शेतकऱ्यांच्या आपसातील तक्रारी वाढत आहेत.

'' टू-फोर-डी '' च्या वापराने द्राक्षाच्या कोवळ्या पानांवर डाग दिसतात. काही वर्षापर्यंत ही विकृती राहते. कोवळी पाने खराब होतात. फुले येणे थांबते. पपईच्या पानांना शॉक बसून ती जळतात. काही मैलाच्या अंतरावर त्याच्या फवारणीचा फटका बसतो. फवारताना तुषार वाऱ्याने पसरतात. सुप्त राग असल्याने काही शेतकरी जाणीवपूर्वक या तणनाशकाचा वापर केल्याने आपसातील तंटे वाढत आहेत. त्यामुळे त्याच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

------

पपई आणि द्राक्षांसाठी टू-फोर-डी हे तणनाशक जालीम आहे. तणांच्या समूळ उच्चाटनासाठी शेतकरी त्याचा वापर करतात. मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्याचा वापर तातडीने थांबवावा.

- आदेश अंकुश मोरे

पपई उत्पादक शेतकरी, कुरनूर

--------

कोणतेही तणनाशक मारताना काळजी घ्यावीच लागते. वाऱ्याची दिशा पाहून त्याची फवारणी करावी. लहान तुषार उडाले तरी नुकसान होऊ शकते. टू-फोर-डी मुळे सरसकट वनस्पती जळतात. योग्य ठिकाणीच त्याचा वापर केला पाहिजे. बंदी घालण्याची मागणी असली तरी ती संयुक्तिक नाही.

- रवींद्र माने

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर