शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST

यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने गळीत हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला होता. ...

यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने गळीत हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला होता. परतीच्या पावसामुळे कारखाने उशिराने सुरू झाले तरीही अपेक्षेपेक्षा दीड महिना गाळप हंगाम लवकर संपत आहे. विशेषत: सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस जवळपास संपला आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हंगाम सुरू ठेवण्याची कारखानदारांची अपेक्षा यंदा फोल ठरली आहे. विशेषतः कमी गाळप क्षमतेचे कारखाने लवकर बंद करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे.

दरवर्षी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना शेजारच्या कर्नाटक राज्यातून ऊसपुरवठा होत होता. जिल्ह्यातील अनेक कारखाने कर्नाटकातील उसावर गाळपाची भिस्त ठेवून होते; परंतु यंदा कर्नाटकातून ऊस आणता आला नाही. कर्नाटकातही साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथील कारखान्यांना गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस उपलब्ध झाला नाही. यंदा कर्नाटकच्या कारखान्यांनीच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात तोडणी आणि वाहतूक यंत्रणा बसविली होती. जिल्ह्यातील कारखान्यांच्या गाळपावर त्याचा परिणाम झाला. जिल्ह्यातील तीन लाख मेट्रिक टन ऊस कर्नाटकात गेल्याने गाळप कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हंगाम ११० दिवसांचाच

सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र पाहता सुरुवातीला गाळप हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज वर्तविला जात होता. साखर उद्योगातील अनुभवी मंडळींनी याच अंदाजानुसार नियोजन केले होते; परंतु हंगाम ११० पेक्षा जास्त दिवस चालण्याची शक्यता नाही. जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र संपत आल्याने हंगाम आटोपता घ्यावा लागला. कमी गाळप क्षमतेचे कारखाने कसेबसे फेब्रुवारी अखेरपर्यंत चालतील, तर जास्त गाळप क्षमतेचे कारखाने १० मार्च पर्यंत चालतील अशी स्थिती आहे.

तोडणी, वाहतूक यंत्रणा परतीच्या मार्गावर

गाळपासाठी ऊस कमी पडल्याने काही कारखाने एक किंवा दोन पाळीत सुरू आहेत. गाळप क्षमतेपेक्षा कमी ऊस उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांचे गाळप क्षमतेपेक्षा कमी गाळप करीत आहेत. ऊस क्षेत्र संपत चालल्याने तोडणी करणाऱ्या टोळ्या आणि वाहतूक यंत्रणा आता परतीच्या तयारीला लागल्या आहेत.

१ कोटी २० लाख मे. टन गाळप

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील २९ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत १ कोटी २० लाख ४९ हजार मे. टन उसाचे गाळप झाले. १ कोटी १० लाख ७९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.१९ टक्के आहे. हंगाम संपेपर्यंतही साखर उतारा १० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी स्थिती नाही.

तोडणी कामगार अडचणीत

संपूर्ण हंगामासाठी १० कोयते असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या टोळीला साखर कारखाने किमान पाच लाख ॲडव्हान्स देतात. हंगामात एक हजारपेक्षा जास्त उसाची तोडणी झाली तरच कारखान्यांनी दिलेल्या ॲडव्हान्सची परतफेड होऊ शकते. यंदा अनेक टोळ्यांचे ॲडव्हान्सदेखील वसूल झाले नाही. कमी गाळप झाल्याने कारखाने, तोडणी कामगार आणि वाहतूक यंत्रणा अडचणीत सापडल्या आहेत.