शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST

यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने गळीत हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला होता. ...

यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने गळीत हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला होता. परतीच्या पावसामुळे कारखाने उशिराने सुरू झाले तरीही अपेक्षेपेक्षा दीड महिना गाळप हंगाम लवकर संपत आहे. विशेषत: सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस जवळपास संपला आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हंगाम सुरू ठेवण्याची कारखानदारांची अपेक्षा यंदा फोल ठरली आहे. विशेषतः कमी गाळप क्षमतेचे कारखाने लवकर बंद करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे.

दरवर्षी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना शेजारच्या कर्नाटक राज्यातून ऊसपुरवठा होत होता. जिल्ह्यातील अनेक कारखाने कर्नाटकातील उसावर गाळपाची भिस्त ठेवून होते; परंतु यंदा कर्नाटकातून ऊस आणता आला नाही. कर्नाटकातही साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथील कारखान्यांना गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस उपलब्ध झाला नाही. यंदा कर्नाटकच्या कारखान्यांनीच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात तोडणी आणि वाहतूक यंत्रणा बसविली होती. जिल्ह्यातील कारखान्यांच्या गाळपावर त्याचा परिणाम झाला. जिल्ह्यातील तीन लाख मेट्रिक टन ऊस कर्नाटकात गेल्याने गाळप कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हंगाम ११० दिवसांचाच

सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र पाहता सुरुवातीला गाळप हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज वर्तविला जात होता. साखर उद्योगातील अनुभवी मंडळींनी याच अंदाजानुसार नियोजन केले होते; परंतु हंगाम ११० पेक्षा जास्त दिवस चालण्याची शक्यता नाही. जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र संपत आल्याने हंगाम आटोपता घ्यावा लागला. कमी गाळप क्षमतेचे कारखाने कसेबसे फेब्रुवारी अखेरपर्यंत चालतील, तर जास्त गाळप क्षमतेचे कारखाने १० मार्च पर्यंत चालतील अशी स्थिती आहे.

तोडणी, वाहतूक यंत्रणा परतीच्या मार्गावर

गाळपासाठी ऊस कमी पडल्याने काही कारखाने एक किंवा दोन पाळीत सुरू आहेत. गाळप क्षमतेपेक्षा कमी ऊस उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांचे गाळप क्षमतेपेक्षा कमी गाळप करीत आहेत. ऊस क्षेत्र संपत चालल्याने तोडणी करणाऱ्या टोळ्या आणि वाहतूक यंत्रणा आता परतीच्या तयारीला लागल्या आहेत.

१ कोटी २० लाख मे. टन गाळप

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील २९ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत १ कोटी २० लाख ४९ हजार मे. टन उसाचे गाळप झाले. १ कोटी १० लाख ७९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.१९ टक्के आहे. हंगाम संपेपर्यंतही साखर उतारा १० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी स्थिती नाही.

तोडणी कामगार अडचणीत

संपूर्ण हंगामासाठी १० कोयते असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या टोळीला साखर कारखाने किमान पाच लाख ॲडव्हान्स देतात. हंगामात एक हजारपेक्षा जास्त उसाची तोडणी झाली तरच कारखान्यांनी दिलेल्या ॲडव्हान्सची परतफेड होऊ शकते. यंदा अनेक टोळ्यांचे ॲडव्हान्सदेखील वसूल झाले नाही. कमी गाळप झाल्याने कारखाने, तोडणी कामगार आणि वाहतूक यंत्रणा अडचणीत सापडल्या आहेत.