शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

राज्यातील १०३ साखर कारखान्यांचे गाळप सुरू, आतापर्यंत एकूण १७ लाख मे. टनाचे झाले गाळप, १५१ कारखान्यांनी घेतले गाळप परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 13:13 IST

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे

ठळक मुद्दे१०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू एकूण १५१ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आलेराज्यातील १०३ साखर कारखान्यांचे १७ लाख २० हजार इतके गाळप

- अरुण बारसकरसोलापूर- राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. एकूण १५१ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. 

यंदा एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे एक नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस २९ आॅक्टोबरपर्यंत पडत राहिल्यानेही कारखाने सुरू करण्यास अडथळा आला होता. ऊस तोडीसाठी वाहने जाण्याची सोय नसल्याने काही कारखान्यांनी उशिराच गाळप हंगाम सुरू केला. याशिवाय शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचाही फटका कारखाने सुरू करण्यासाठी बसला आहे. रविवारी कोल्हापूर येथे ऊस दराचा तिढा सुटल्यानंतर सगळीकडेच कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या राज्यात गाळप परवाना दिलेल्या कारखान्यांपैकी १०३ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. राज्यातील सात विभागांपैकी नागपूर वगळता अन्य सहा विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. कारखान्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील १९, पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ३६, अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील १९, औरंगाबाद विभागातील धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील  १०, नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर १७ व अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असल्याची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाकडे आली आहे. --------------------उताºयात पुणे विभाग आघाडीवर !- राज्यातील १०३ साखर कारखान्यांचे १७ लाख २० हजार इतके गाळप झाले.- गाळप झालेल्या उसापोटी १० लाख ६५ हजार क्विंटल साखर तयार झाली असून साखर उतारा ६.२० टक्के इतका पडला.- साखर कारखान्याच्या संख्येत आघाडीवर असलेल्या पुणे विभागातील कारखाने गाळपातही आघाडीवर असून  उताºयातही आज तरी सोलापूर जिल्ह्याची आघाडी आहे. - साखर आयुक्त कार्यालयाला कारखाने सुरू झालेली संख्या १०३ इतकीच नोंदली असली तरी प्रत्यक्षात १२५ हून अधिक कारखाने सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. - राज्यातील सर्वच सात विभागातील गाळप परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १९३ पैकी १५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे.