शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

राज्यातील १०३ साखर कारखान्यांचे गाळप सुरू, आतापर्यंत एकूण १७ लाख मे. टनाचे झाले गाळप, १५१ कारखान्यांनी घेतले गाळप परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 13:13 IST

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे

ठळक मुद्दे१०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू एकूण १५१ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आलेराज्यातील १०३ साखर कारखान्यांचे १७ लाख २० हजार इतके गाळप

- अरुण बारसकरसोलापूर- राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. एकूण १५१ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. 

यंदा एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे एक नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस २९ आॅक्टोबरपर्यंत पडत राहिल्यानेही कारखाने सुरू करण्यास अडथळा आला होता. ऊस तोडीसाठी वाहने जाण्याची सोय नसल्याने काही कारखान्यांनी उशिराच गाळप हंगाम सुरू केला. याशिवाय शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचाही फटका कारखाने सुरू करण्यासाठी बसला आहे. रविवारी कोल्हापूर येथे ऊस दराचा तिढा सुटल्यानंतर सगळीकडेच कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या राज्यात गाळप परवाना दिलेल्या कारखान्यांपैकी १०३ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. राज्यातील सात विभागांपैकी नागपूर वगळता अन्य सहा विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. कारखान्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील १९, पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ३६, अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील १९, औरंगाबाद विभागातील धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील  १०, नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर १७ व अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असल्याची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाकडे आली आहे. --------------------उताºयात पुणे विभाग आघाडीवर !- राज्यातील १०३ साखर कारखान्यांचे १७ लाख २० हजार इतके गाळप झाले.- गाळप झालेल्या उसापोटी १० लाख ६५ हजार क्विंटल साखर तयार झाली असून साखर उतारा ६.२० टक्के इतका पडला.- साखर कारखान्याच्या संख्येत आघाडीवर असलेल्या पुणे विभागातील कारखाने गाळपातही आघाडीवर असून  उताºयातही आज तरी सोलापूर जिल्ह्याची आघाडी आहे. - साखर आयुक्त कार्यालयाला कारखाने सुरू झालेली संख्या १०३ इतकीच नोंदली असली तरी प्रत्यक्षात १२५ हून अधिक कारखाने सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. - राज्यातील सर्वच सात विभागातील गाळप परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १९३ पैकी १५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे.