शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

राज्यातील १०३ साखर कारखान्यांचे गाळप सुरू, आतापर्यंत एकूण १७ लाख मे. टनाचे झाले गाळप, १५१ कारखान्यांनी घेतले गाळप परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 13:13 IST

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे

ठळक मुद्दे१०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू एकूण १५१ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आलेराज्यातील १०३ साखर कारखान्यांचे १७ लाख २० हजार इतके गाळप

- अरुण बारसकरसोलापूर- राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. एकूण १५१ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. 

यंदा एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे एक नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस २९ आॅक्टोबरपर्यंत पडत राहिल्यानेही कारखाने सुरू करण्यास अडथळा आला होता. ऊस तोडीसाठी वाहने जाण्याची सोय नसल्याने काही कारखान्यांनी उशिराच गाळप हंगाम सुरू केला. याशिवाय शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचाही फटका कारखाने सुरू करण्यासाठी बसला आहे. रविवारी कोल्हापूर येथे ऊस दराचा तिढा सुटल्यानंतर सगळीकडेच कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या राज्यात गाळप परवाना दिलेल्या कारखान्यांपैकी १०३ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. राज्यातील सात विभागांपैकी नागपूर वगळता अन्य सहा विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. कारखान्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील १९, पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ३६, अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील १९, औरंगाबाद विभागातील धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील  १०, नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर १७ व अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असल्याची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाकडे आली आहे. --------------------उताºयात पुणे विभाग आघाडीवर !- राज्यातील १०३ साखर कारखान्यांचे १७ लाख २० हजार इतके गाळप झाले.- गाळप झालेल्या उसापोटी १० लाख ६५ हजार क्विंटल साखर तयार झाली असून साखर उतारा ६.२० टक्के इतका पडला.- साखर कारखान्याच्या संख्येत आघाडीवर असलेल्या पुणे विभागातील कारखाने गाळपातही आघाडीवर असून  उताºयातही आज तरी सोलापूर जिल्ह्याची आघाडी आहे. - साखर आयुक्त कार्यालयाला कारखाने सुरू झालेली संख्या १०३ इतकीच नोंदली असली तरी प्रत्यक्षात १२५ हून अधिक कारखाने सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. - राज्यातील सर्वच सात विभागातील गाळप परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १९३ पैकी १५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे.