शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंग कारखान्याच्या प्रदूषणामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST

दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. ...

दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. त्यामुळे फळांना बाजारभावापेक्षा निम्म्या दराने भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पांडुरंग कारखान्याचे अधिक क्षमतेने गाळप चालू असल्यामुळे बॉयलरच्या चिमणीतून अधिक काजळीची राख बाहेर फेकल्यामुळे कारखान्यापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर पसरत आहे. त्यामुळे या परिसरात हजारो एकर शेती बाधित झाली आहे. या राखेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रदूषणाबाबत म्हाळुंगी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठरावही केला होता, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

कारखाना चांगला; पण का वाढले प्रदूषण

कार्यकारी संचालकांचा अधिकारी व कामगार वर्गाशी समन्वयाचा अभाव असल्यामुळे करोडो रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसवूनही ती यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित होत नसल्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. कारखान्याने राज्य व देशपातळीवर मोठे नाव कमविले आहे. ते नाव जतन करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी कारखाना प्रशासनावर लक्ष घालावे, अशी मागणी संचालक, सभासद शेतकऱ्यांमधून होत आहे.

कोट ::::::::::::::::::::::

पांडुरंग कारखाना प्रदूषणाबाबत सर्व नियमांचे पालन करीत आहे. कारखान्याने ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित करून दिल्लीच्या सर्व्हरला जोडून घेतली आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण राहते. बॉयलरमधून राख जात नाही. बाजूला साठलेली राख वाऱ्याने उडून जात आहे. तरी आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीचे योग्य ते निवारण करीत असतो.

- यशवंत कुलकर्णी

कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना, श्रीपूर

कोट :::::::::::::::

शेतकऱ्यांच्या तक्रारीत माझे क्षेत्र कारखान्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या क्षेत्रामध्ये ॲपल बोर, डाळिंब, केळीच्या बागा आहेत. पांडुरंग कारखान्याच्या चिमणीतून राख फळबागांवर पडल्याने बाजारात माल अत्यंत कमी दराने विक्री होत आहे. त्यामुळे आठ ते दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राखेमुळे तोडणीस मजूर जास्त पगार मागत आहेत. तसेच मजुरांच्या डोळ्यात राख जाऊन डोळ्याचे आजार होत आहे. त्याचाही खर्च करावा लागत आहे.

- अशोक मारुती जाधव

महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार शेतकरी

कोट ::::::::::::::::::::

माझी साडेपाच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड आहे. पांडुरंग कारखान्याच्या बॉयलरमधून निघणारी राख केळीच्या पिकावर पडत आहे. राखेमुळे खराब झालेल्या केळीला बाजारात मागणी नाही. त्यामुळे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- मनीषा सुरेश मुंडफणे

महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार महिला शेतकरी