शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

पांडुरंग कारखान्याच्या प्रदूषणामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST

दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. ...

दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. त्यामुळे फळांना बाजारभावापेक्षा निम्म्या दराने भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पांडुरंग कारखान्याचे अधिक क्षमतेने गाळप चालू असल्यामुळे बॉयलरच्या चिमणीतून अधिक काजळीची राख बाहेर फेकल्यामुळे कारखान्यापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर पसरत आहे. त्यामुळे या परिसरात हजारो एकर शेती बाधित झाली आहे. या राखेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रदूषणाबाबत म्हाळुंगी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठरावही केला होता, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

कारखाना चांगला; पण का वाढले प्रदूषण

कार्यकारी संचालकांचा अधिकारी व कामगार वर्गाशी समन्वयाचा अभाव असल्यामुळे करोडो रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसवूनही ती यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित होत नसल्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. कारखान्याने राज्य व देशपातळीवर मोठे नाव कमविले आहे. ते नाव जतन करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी कारखाना प्रशासनावर लक्ष घालावे, अशी मागणी संचालक, सभासद शेतकऱ्यांमधून होत आहे.

कोट ::::::::::::::::::::::

पांडुरंग कारखाना प्रदूषणाबाबत सर्व नियमांचे पालन करीत आहे. कारखान्याने ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित करून दिल्लीच्या सर्व्हरला जोडून घेतली आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण राहते. बॉयलरमधून राख जात नाही. बाजूला साठलेली राख वाऱ्याने उडून जात आहे. तरी आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीचे योग्य ते निवारण करीत असतो.

- यशवंत कुलकर्णी

कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना, श्रीपूर

कोट :::::::::::::::

शेतकऱ्यांच्या तक्रारीत माझे क्षेत्र कारखान्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या क्षेत्रामध्ये ॲपल बोर, डाळिंब, केळीच्या बागा आहेत. पांडुरंग कारखान्याच्या चिमणीतून राख फळबागांवर पडल्याने बाजारात माल अत्यंत कमी दराने विक्री होत आहे. त्यामुळे आठ ते दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राखेमुळे तोडणीस मजूर जास्त पगार मागत आहेत. तसेच मजुरांच्या डोळ्यात राख जाऊन डोळ्याचे आजार होत आहे. त्याचाही खर्च करावा लागत आहे.

- अशोक मारुती जाधव

महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार शेतकरी

कोट ::::::::::::::::::::

माझी साडेपाच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड आहे. पांडुरंग कारखान्याच्या बॉयलरमधून निघणारी राख केळीच्या पिकावर पडत आहे. राखेमुळे खराब झालेल्या केळीला बाजारात मागणी नाही. त्यामुळे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- मनीषा सुरेश मुंडफणे

महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार महिला शेतकरी