शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंग कारखान्याच्या प्रदूषणामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST

दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. ...

दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. त्यामुळे फळांना बाजारभावापेक्षा निम्म्या दराने भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पांडुरंग कारखान्याचे अधिक क्षमतेने गाळप चालू असल्यामुळे बॉयलरच्या चिमणीतून अधिक काजळीची राख बाहेर फेकल्यामुळे कारखान्यापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर पसरत आहे. त्यामुळे या परिसरात हजारो एकर शेती बाधित झाली आहे. या राखेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रदूषणाबाबत म्हाळुंगी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठरावही केला होता, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

कारखाना चांगला; पण का वाढले प्रदूषण

कार्यकारी संचालकांचा अधिकारी व कामगार वर्गाशी समन्वयाचा अभाव असल्यामुळे करोडो रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसवूनही ती यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित होत नसल्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. कारखान्याने राज्य व देशपातळीवर मोठे नाव कमविले आहे. ते नाव जतन करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी कारखाना प्रशासनावर लक्ष घालावे, अशी मागणी संचालक, सभासद शेतकऱ्यांमधून होत आहे.

कोट ::::::::::::::::::::::

पांडुरंग कारखाना प्रदूषणाबाबत सर्व नियमांचे पालन करीत आहे. कारखान्याने ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित करून दिल्लीच्या सर्व्हरला जोडून घेतली आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण राहते. बॉयलरमधून राख जात नाही. बाजूला साठलेली राख वाऱ्याने उडून जात आहे. तरी आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीचे योग्य ते निवारण करीत असतो.

- यशवंत कुलकर्णी

कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना, श्रीपूर

कोट :::::::::::::::

शेतकऱ्यांच्या तक्रारीत माझे क्षेत्र कारखान्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या क्षेत्रामध्ये ॲपल बोर, डाळिंब, केळीच्या बागा आहेत. पांडुरंग कारखान्याच्या चिमणीतून राख फळबागांवर पडल्याने बाजारात माल अत्यंत कमी दराने विक्री होत आहे. त्यामुळे आठ ते दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राखेमुळे तोडणीस मजूर जास्त पगार मागत आहेत. तसेच मजुरांच्या डोळ्यात राख जाऊन डोळ्याचे आजार होत आहे. त्याचाही खर्च करावा लागत आहे.

- अशोक मारुती जाधव

महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार शेतकरी

कोट ::::::::::::::::::::

माझी साडेपाच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड आहे. पांडुरंग कारखान्याच्या बॉयलरमधून निघणारी राख केळीच्या पिकावर पडत आहे. राखेमुळे खराब झालेल्या केळीला बाजारात मागणी नाही. त्यामुळे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- मनीषा सुरेश मुंडफणे

महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार महिला शेतकरी