शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

विनाकारण फिरणाऱ्या ३७१४ जणांवर गुन्हे; साडेतेरा लाख दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST

विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. शेवटी पोलिसांनी दहा दिवसांपासून पोलीस ...

विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. शेवटी पोलिसांनी दहा दिवसांपासून पोलीस निरीक्षक गवळी यांनी कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आणि अंमल सुरू झाला आहे. दहा दिवसांत विनामास्क फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे, विनाकारण फिरणारे, कायदा मोडून दुकाने सुरू ठेवलेल्याचे दुकाने सील करणे असे विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या ३७१४ जणांवर दंडात्मक तर काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

यासाठी फौजदार चंदू बेरड, रेवणसिद्ध काळे, वाहतूक पोलीस आर. पी. शेख, सी. बी. बेळ्ळे, आय. आय. शेख, संजय जाधव, मल्लिनाथ कलशेट्टी, सुरेश जाधव, अजय भोसले, एजाज मुल्ला, किसन घंट्टे, अरुण राऊत, शंकर राठोड, सुनील माने, सुभाष दासरी, रणजित भोसले, लक्ष्मण कांबळे, अजय शिंदे, श्रीकांत जवळगे, इरणा सुतार, मंगरुळे यांच्या पथकाने दिवस-रात्र कारवाईचे अस्त्र उगारलेले आहे.

----

अशी झाली कारवाई

दहा दिवसांत विनामास्क फिरणारे १,८८३, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- ६७८, सोशल डिस्टन्सिंग ७६९, विनाकारण फिरणारे ३८४, दुचाकी जप्त- ६०, दुकाने सील-३० अशा ३,७१४ लोकांवर कारवाई करण्यात आली. या माध्यमातून १३ लाख, ५४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

----

कोरोनाचे कहर वाढत असताना विनाकारण फिरणे, कोरोनाचे नियम पायदळी तुडवणे अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारला. म्हणून आज रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहेत. नियम पाळण्याची जबाबदारी प्रशासनासह नागरिकांचीही आहे. हे होत नसल्याने पोलिसांना शेवटी कारवाई करावी लागत आहे.

- राजेश गवळी, पोलीस निरीक्षक.

----२७अक्कलकोट ॲक्शन१,२

दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्णांचे वाढत्या पार्श्वभूमीवर कारवाई करत असताना पो.नि. राजेश गवळी, पो. उपनिरीक्षक चंदू बेरड, पोलीस कर्मचारी आदी.