शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे ...

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने आर्थिक नियोजन करून सरपंच व सदस्यांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले तर देश महासत्ता नक्की होईल, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

सोनंद (ता. सांगोला) येथे केंद्रीय आश्रमशाळा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच समाधान पाटील, विनायक मिसाळ, प्रकाश काशीद, संजय काशीद, सुनील काशीद, दत्तात्रय खांडेकर, तुकाराम पाटील, समाधान पाटील, राजकुमार बाबर, माजी सरपंच महादेव पाटील, विजय देवकर, राजेंद्र यादव, दीपक चोथे, जितेंद्र बोत्रे, राहुल टकले, सतीश काशीद, कल्याण भोसले, हनमंतगावचे तात्यासाहेब खांडेकर, संतोष खांडेकर, दत्ता खांडेकर, बीरा झुरळे, समाधान खांडेकर उपस्थित होते.

पेरे पाटील पुढे म्हणाले, आर्थिक नियोजनाशिवाय विकास होणे शक्य नाही. मात्र, त्यावर कोणीच बोलत नाही. सध्या वीज बिल माफीचा मुद्दा चर्चेत आहे. हा मुद्दा भावनिक करून चालणार नाही, वीज बिल माफ केले तर वीज मंडळाने काय करायचे, असे अनेक प्रश्न आहेत. आपल्या गावाचा विकास आपण आपल्या पैशातून करायचा असेल तर सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन राजकारण बाजूला ठेवून आर्थिक नियोजन करावे. आज पाटोद्यासारख्या कमी लोकसंख्येच्या गावात ७५० कुटुंबांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये कर घेऊन जमा होणाऱ्या ३० लाख रुपये करातून लोकांना पिण्यासाठी आर.ओ.चे पाणी, आंघोळीला गरम पाणी, वर्षभर मोफत दळण आदी सुविधा पुरवल्या आहेत. यापुढे जे लोक आर्थिक नियोजन करतील तेच विकास करू शकतील, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक संस्थाध्यक्ष जगदीश बाबर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्राचार्य दिगंबर साळुंखे यांनी मानले.

----

फोटो : १६ भास्कर पेरे पाटील