शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे ...

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने आर्थिक नियोजन करून सरपंच व सदस्यांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले तर देश महासत्ता नक्की होईल, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

सोनंद (ता. सांगोला) येथे केंद्रीय आश्रमशाळा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच समाधान पाटील, विनायक मिसाळ, प्रकाश काशीद, संजय काशीद, सुनील काशीद, दत्तात्रय खांडेकर, तुकाराम पाटील, समाधान पाटील, राजकुमार बाबर, माजी सरपंच महादेव पाटील, विजय देवकर, राजेंद्र यादव, दीपक चोथे, जितेंद्र बोत्रे, राहुल टकले, सतीश काशीद, कल्याण भोसले, हनमंतगावचे तात्यासाहेब खांडेकर, संतोष खांडेकर, दत्ता खांडेकर, बीरा झुरळे, समाधान खांडेकर उपस्थित होते.

पेरे पाटील पुढे म्हणाले, आर्थिक नियोजनाशिवाय विकास होणे शक्य नाही. मात्र, त्यावर कोणीच बोलत नाही. सध्या वीज बिल माफीचा मुद्दा चर्चेत आहे. हा मुद्दा भावनिक करून चालणार नाही, वीज बिल माफ केले तर वीज मंडळाने काय करायचे, असे अनेक प्रश्न आहेत. आपल्या गावाचा विकास आपण आपल्या पैशातून करायचा असेल तर सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन राजकारण बाजूला ठेवून आर्थिक नियोजन करावे. आज पाटोद्यासारख्या कमी लोकसंख्येच्या गावात ७५० कुटुंबांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये कर घेऊन जमा होणाऱ्या ३० लाख रुपये करातून लोकांना पिण्यासाठी आर.ओ.चे पाणी, आंघोळीला गरम पाणी, वर्षभर मोफत दळण आदी सुविधा पुरवल्या आहेत. यापुढे जे लोक आर्थिक नियोजन करतील तेच विकास करू शकतील, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक संस्थाध्यक्ष जगदीश बाबर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्राचार्य दिगंबर साळुंखे यांनी मानले.

----

फोटो : १६ भास्कर पेरे पाटील