शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे ...

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने आर्थिक नियोजन करून सरपंच व सदस्यांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले तर देश महासत्ता नक्की होईल, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

सोनंद (ता. सांगोला) येथे केंद्रीय आश्रमशाळा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच समाधान पाटील, विनायक मिसाळ, प्रकाश काशीद, संजय काशीद, सुनील काशीद, दत्तात्रय खांडेकर, तुकाराम पाटील, समाधान पाटील, राजकुमार बाबर, माजी सरपंच महादेव पाटील, विजय देवकर, राजेंद्र यादव, दीपक चोथे, जितेंद्र बोत्रे, राहुल टकले, सतीश काशीद, कल्याण भोसले, हनमंतगावचे तात्यासाहेब खांडेकर, संतोष खांडेकर, दत्ता खांडेकर, बीरा झुरळे, समाधान खांडेकर उपस्थित होते.

पेरे पाटील पुढे म्हणाले, आर्थिक नियोजनाशिवाय विकास होणे शक्य नाही. मात्र, त्यावर कोणीच बोलत नाही. सध्या वीज बिल माफीचा मुद्दा चर्चेत आहे. हा मुद्दा भावनिक करून चालणार नाही, वीज बिल माफ केले तर वीज मंडळाने काय करायचे, असे अनेक प्रश्न आहेत. आपल्या गावाचा विकास आपण आपल्या पैशातून करायचा असेल तर सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन राजकारण बाजूला ठेवून आर्थिक नियोजन करावे. आज पाटोद्यासारख्या कमी लोकसंख्येच्या गावात ७५० कुटुंबांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये कर घेऊन जमा होणाऱ्या ३० लाख रुपये करातून लोकांना पिण्यासाठी आर.ओ.चे पाणी, आंघोळीला गरम पाणी, वर्षभर मोफत दळण आदी सुविधा पुरवल्या आहेत. यापुढे जे लोक आर्थिक नियोजन करतील तेच विकास करू शकतील, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक संस्थाध्यक्ष जगदीश बाबर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्राचार्य दिगंबर साळुंखे यांनी मानले.

----

फोटो : १६ भास्कर पेरे पाटील