शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे ...

सांगोला : ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, देश महासत्ता होणार नाही, त्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने आर्थिक नियोजन करून सरपंच व सदस्यांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले तर देश महासत्ता नक्की होईल, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

सोनंद (ता. सांगोला) येथे केंद्रीय आश्रमशाळा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच समाधान पाटील, विनायक मिसाळ, प्रकाश काशीद, संजय काशीद, सुनील काशीद, दत्तात्रय खांडेकर, तुकाराम पाटील, समाधान पाटील, राजकुमार बाबर, माजी सरपंच महादेव पाटील, विजय देवकर, राजेंद्र यादव, दीपक चोथे, जितेंद्र बोत्रे, राहुल टकले, सतीश काशीद, कल्याण भोसले, हनमंतगावचे तात्यासाहेब खांडेकर, संतोष खांडेकर, दत्ता खांडेकर, बीरा झुरळे, समाधान खांडेकर उपस्थित होते.

पेरे पाटील पुढे म्हणाले, आर्थिक नियोजनाशिवाय विकास होणे शक्य नाही. मात्र, त्यावर कोणीच बोलत नाही. सध्या वीज बिल माफीचा मुद्दा चर्चेत आहे. हा मुद्दा भावनिक करून चालणार नाही, वीज बिल माफ केले तर वीज मंडळाने काय करायचे, असे अनेक प्रश्न आहेत. आपल्या गावाचा विकास आपण आपल्या पैशातून करायचा असेल तर सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन राजकारण बाजूला ठेवून आर्थिक नियोजन करावे. आज पाटोद्यासारख्या कमी लोकसंख्येच्या गावात ७५० कुटुंबांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये कर घेऊन जमा होणाऱ्या ३० लाख रुपये करातून लोकांना पिण्यासाठी आर.ओ.चे पाणी, आंघोळीला गरम पाणी, वर्षभर मोफत दळण आदी सुविधा पुरवल्या आहेत. यापुढे जे लोक आर्थिक नियोजन करतील तेच विकास करू शकतील, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक संस्थाध्यक्ष जगदीश बाबर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्राचार्य दिगंबर साळुंखे यांनी मानले.

----

फोटो : १६ भास्कर पेरे पाटील