शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

रात्रीच्या अंधारात जाळावी लागतात प्रेते; मोबाईल टॉर्चचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी असणाऱ्या महाळूंग ग्रामपंचायतीच्या परिसरात चार ते पाच मशानभूमी आहेत. काही स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता तर ...

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी असणाऱ्या महाळूंग ग्रामपंचायतीच्या परिसरात चार ते पाच मशानभूमी आहेत. काही स्मशानभूमीमध्ये

जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता तर नाहीच. श्रीपूरमधील स्मशानभूमीमध्ये तर रात्री अंधार असल्यामुळे प्रेत जाळताना नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

या ठिकाणी सद्यस्थितीला प्रशासक नेमण्यात आला आहे.

महाळूंग ग्रामपंचायतीचे महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. सध्या नगर विकास

मंत्रालयाचे नियंत्रण आले आहे. आत्तापर्यंत ठोस अधिकारी देखील नेमण्यात

आला नाही. त्यामुळे सर्व परिसरातील नागरिकांमधून ताबडतोब श्रीपूर स्मशानभूमीसह परिसरातील इतर स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, रस्त्यांची सोय करावी, लाईट, पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याचे पडसाद येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीवर

मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

‘ब्रिमासागर’ने केली दिवाबत्तीची सोय

महाळूंग-श्रीपूरमधील स्मशानभूमीत गडद अंधार, मोबाइल टॉर्च लावून प्रेते जाळावी लागतात, याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यात मदत करणाऱ्या ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसलरीचे डायरेक्टर भरतकुमार सेठीया आणि जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर यांच्याशी झेडपी सदस्य अरुण तोडकर यांनी चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत श्रीपूर स्मशानभूमीमध्ये ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टलरीतर्फे दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली.

कोट ::::::::::::::::::

सध्या महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे येथे प्रशासक आहे. येथे जिल्हा परिषदेचा निधी खर्च करता येत नाही. म्हणून मी संबंधित कारखान्याशी चर्चा करून दिवाबत्तीची सोय करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी रात्रीच दिवा बसविला आहे.

- अरूण तोडकर

झेडपी सदस्य