शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

कुच बिहार ट्रॉफी; पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा पहिला डाव १३५ मध्ये संपुष्टात

By appasaheb.patil | Updated: November 6, 2024 17:30 IST

केरळच्या आदित्य बैजू चे पाच तर कर्णधार अहम्मेद इम्रानचे चार बळी, एस अक्षयचे नाबाद अर्धशतक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध केरळ या १९ वर्षाखालील कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी केरळ संघाने बाद धावा केल्या. तत्पूर्वी महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ १३५ धावात संपुष्टात आला तो केरळचा सलामीचा मध्यमगती गोलंदाज आदिथ्य बैजू ने घेतलेल्या ५ तर कर्णधार फिरकी गोलंदाज अहम्मेद इम्रान ने घेतलेल्या ४ बळीमुळे.

सकाळी नाणेफेक जिंकून केरळ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवत आदित्थ ने  तिसऱ्या व पाचव्या षटकात नीरज जोशी व साहिल नाळगे यांना शून्यावर बाद करत धक्के दिले. लगेचच ३१ धावांवर ३ रा गडी सुश्रुत सावंत आणि पाठोपाठ ३५ धावा असताना साहिल पारिखला बाद केला ते मोहम्मद जसील आणि आदित्थने. त्यानंतर आलेल्या कर्णधार किरण चोरमले ने (२४) यश्टिरक्षक अनुराग कवडे (२९) सोबत ४५ धावांची भागीदारी केली खरी पण दोघांना १५ धावांच्या फरकाने बाद केले ते कर्णधार मोहम्मद इम्रान याने (२९ धावात ४ बळी).  त्यापुढील केवळ ११ धावात महाराष्ट्राने पुन्हा तीन गडी - पार्थ देवकर (०), कार्तिक शेवाळे (०), ओम भाबड (१२) गमावले. 

जेवणाला खेळ थांबला तेव्हा ७ बाद १०३ धावसंख्या होती. त्यानंतर तळातील गडी योगेश चव्हाण ने थोडाफार प्रतिकार करत धावसंख्या १३५ पर्यंत नेली पण आदिथ्य ने त्याचा २४ धावात ५ वा बळी मिळवत महाराष्ट्राचा पहिला डाव पहिल्याच दिवशी ४१ व्या षटकात संपुष्टात आणला तो जेवणानंतर केवळ ७ षटक झाल्यावर. केरळच्या पहिल्या डावाची सुरूवात देखील डळमळीत झाली ती निलय शिंगवी ने तिसऱ्याच षटकात घेतलेल्या बळी मुळे. सलामीवीर अहमद खान (८) याच्यानंतर चहापानाच्या आधीच्या शेवटच्या चेंडूवर ओम भाबड कडून दुसरा गडी - एस.सौरभ (२१) बाद झाला तेंव्हा धावसंख्या झालेली ५८.

चहापान नंतर यष्टीरक्षक फलंदाज एस एस अक्षय आणि कर्णधार मोहम्मद इमरान यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५०+ धावांची भागीदारी करत धावसंख्या शंभर पार नेली. अक्षय ने ८४ चेंडूत ६ चौकारानिशी त्याचे अर्धशतक साजरे केले. ९९ धावांची भागीदारी झालेली असताना कर्णधार मोहम्मद इम्रान (३९) बाद झाला. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा ४७ षटकात केरळ संघाने ३ बाद १६५ धावा केलेल्या एस अक्षय नाबाद ६९ (९ चौकार) , थॉमस मॅथ्यू ६ धावांवर खेळत असून ३० धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून फाजिल मोहम्मद तर मैदानी पंच म्हणून अच्युत व सुद अभिरूपे हे आणि गुणलेखक म्हणून दोन्ही महिला केतकी नाईक जामगावकर व पूर्णिमा आपटे आणि ACLO म्हणू  चंदन गंगावणे काम पाहत आहेत.