शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुच बिहार ट्रॉफी; पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा पहिला डाव १३५ मध्ये संपुष्टात

By appasaheb.patil | Updated: November 6, 2024 17:30 IST

केरळच्या आदित्य बैजू चे पाच तर कर्णधार अहम्मेद इम्रानचे चार बळी, एस अक्षयचे नाबाद अर्धशतक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध केरळ या १९ वर्षाखालील कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी केरळ संघाने बाद धावा केल्या. तत्पूर्वी महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ १३५ धावात संपुष्टात आला तो केरळचा सलामीचा मध्यमगती गोलंदाज आदिथ्य बैजू ने घेतलेल्या ५ तर कर्णधार फिरकी गोलंदाज अहम्मेद इम्रान ने घेतलेल्या ४ बळीमुळे.

सकाळी नाणेफेक जिंकून केरळ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवत आदित्थ ने  तिसऱ्या व पाचव्या षटकात नीरज जोशी व साहिल नाळगे यांना शून्यावर बाद करत धक्के दिले. लगेचच ३१ धावांवर ३ रा गडी सुश्रुत सावंत आणि पाठोपाठ ३५ धावा असताना साहिल पारिखला बाद केला ते मोहम्मद जसील आणि आदित्थने. त्यानंतर आलेल्या कर्णधार किरण चोरमले ने (२४) यश्टिरक्षक अनुराग कवडे (२९) सोबत ४५ धावांची भागीदारी केली खरी पण दोघांना १५ धावांच्या फरकाने बाद केले ते कर्णधार मोहम्मद इम्रान याने (२९ धावात ४ बळी).  त्यापुढील केवळ ११ धावात महाराष्ट्राने पुन्हा तीन गडी - पार्थ देवकर (०), कार्तिक शेवाळे (०), ओम भाबड (१२) गमावले. 

जेवणाला खेळ थांबला तेव्हा ७ बाद १०३ धावसंख्या होती. त्यानंतर तळातील गडी योगेश चव्हाण ने थोडाफार प्रतिकार करत धावसंख्या १३५ पर्यंत नेली पण आदिथ्य ने त्याचा २४ धावात ५ वा बळी मिळवत महाराष्ट्राचा पहिला डाव पहिल्याच दिवशी ४१ व्या षटकात संपुष्टात आणला तो जेवणानंतर केवळ ७ षटक झाल्यावर. केरळच्या पहिल्या डावाची सुरूवात देखील डळमळीत झाली ती निलय शिंगवी ने तिसऱ्याच षटकात घेतलेल्या बळी मुळे. सलामीवीर अहमद खान (८) याच्यानंतर चहापानाच्या आधीच्या शेवटच्या चेंडूवर ओम भाबड कडून दुसरा गडी - एस.सौरभ (२१) बाद झाला तेंव्हा धावसंख्या झालेली ५८.

चहापान नंतर यष्टीरक्षक फलंदाज एस एस अक्षय आणि कर्णधार मोहम्मद इमरान यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५०+ धावांची भागीदारी करत धावसंख्या शंभर पार नेली. अक्षय ने ८४ चेंडूत ६ चौकारानिशी त्याचे अर्धशतक साजरे केले. ९९ धावांची भागीदारी झालेली असताना कर्णधार मोहम्मद इम्रान (३९) बाद झाला. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा ४७ षटकात केरळ संघाने ३ बाद १६५ धावा केलेल्या एस अक्षय नाबाद ६९ (९ चौकार) , थॉमस मॅथ्यू ६ धावांवर खेळत असून ३० धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून फाजिल मोहम्मद तर मैदानी पंच म्हणून अच्युत व सुद अभिरूपे हे आणि गुणलेखक म्हणून दोन्ही महिला केतकी नाईक जामगावकर व पूर्णिमा आपटे आणि ACLO म्हणू  चंदन गंगावणे काम पाहत आहेत.