शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

सोलापूर प्रशिक्षण केंद्रात राज्यातील ६२९ महिला पोलीसांचे दीक्षांत संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 14:37 IST

सोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़ यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली़ त्यानंतर परेड व प्रशिक्षणार्थी पोलीसांनी शानदान संचलन केले़ यावेळी परेड कमांडर म्हणून पूनम गुंड, छाया उडतेवार, अंकिता मोहोळ, रेखा आगलावे, ज्योती फरकटे, अक्षता माळी व कविता साळुंखे यांनी आपले प्लाटून मार्च केले़ यावेळी सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १० यांचे बॅन्ड पथक कार्यरत होते़ -----------अक्षमा माळी सर्वोत्कृष्टया प्रशिक्षणात मुंबई रेल्वेची प्रशिक्षणार्थी अक्षता रमण माळी ही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरली़ याशिवाय पूनम शिवाजी गुंड (व्दितीय - पुणे ग्रामीण), सुप्रिया बाळासाहेब भोईटे (तृतीय - मुंबई शहर), गोळीबार प्रकारात पूनम शिवाजी गुंड ही प्रथम तर चांदणी देवीदास कोंढे व अंबिका विलास जाधव या दोघींनी व्दितीय क्रमांक पटकाविला़ या कार्यक्रमावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांनी अहवाल वाचन केले़  त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींना शपथ दिली़ दीक्षांत संचलनानंतर प्रशिक्षणार्थी पोलीसांनी लेझीम, अदिवासी नृत्य व कमांन्डो सायलेन्ट ड्रिल असे विविध कार्यक्रम सादर केले़ या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर, प्रशिक्षणार्थींचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते़ --------------पोलीस शिपाई हा महत्वाचा कणा : तांबडेपोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले़ पुढे बोलताना तांबडे म्हणाले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने पोलीस खात्यावर आहे़ वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे, दहशतवाद यासारख्या गुन्ह्याचे आवाहन आता पोलीस दलासमोर असल्याचेही नमुद केले़