शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

सोलापूर प्रशिक्षण केंद्रात राज्यातील ६२९ महिला पोलीसांचे दीक्षांत संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 14:37 IST

सोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला़ यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली़ त्यानंतर परेड व प्रशिक्षणार्थी पोलीसांनी शानदान संचलन केले़ यावेळी परेड कमांडर म्हणून पूनम गुंड, छाया उडतेवार, अंकिता मोहोळ, रेखा आगलावे, ज्योती फरकटे, अक्षता माळी व कविता साळुंखे यांनी आपले प्लाटून मार्च केले़ यावेळी सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १० यांचे बॅन्ड पथक कार्यरत होते़ -----------अक्षमा माळी सर्वोत्कृष्टया प्रशिक्षणात मुंबई रेल्वेची प्रशिक्षणार्थी अक्षता रमण माळी ही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरली़ याशिवाय पूनम शिवाजी गुंड (व्दितीय - पुणे ग्रामीण), सुप्रिया बाळासाहेब भोईटे (तृतीय - मुंबई शहर), गोळीबार प्रकारात पूनम शिवाजी गुंड ही प्रथम तर चांदणी देवीदास कोंढे व अंबिका विलास जाधव या दोघींनी व्दितीय क्रमांक पटकाविला़ या कार्यक्रमावेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर-पवार यांनी अहवाल वाचन केले़  त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींना शपथ दिली़ दीक्षांत संचलनानंतर प्रशिक्षणार्थी पोलीसांनी लेझीम, अदिवासी नृत्य व कमांन्डो सायलेन्ट ड्रिल असे विविध कार्यक्रम सादर केले़ या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर, प्रशिक्षणार्थींचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते़ --------------पोलीस शिपाई हा महत्वाचा कणा : तांबडेपोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले़ पुढे बोलताना तांबडे म्हणाले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने पोलीस खात्यावर आहे़ वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे, दहशतवाद यासारख्या गुन्ह्याचे आवाहन आता पोलीस दलासमोर असल्याचेही नमुद केले़