शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सोलापूर जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी अपात्रतेच्या कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:34 IST

सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी सध्या अपात्रतेच्या कात्रीत अडकले आहेत. निवडणूक खर्च सादर न करणे, अतिक्रमण करणे, शौचालय नसणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे अशा तांत्रिक बाबींचा ठपका ठेवल्याने त्यावर सध्या सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी सात सप्टेंबरला पूर्ण होणार असल्याने काय निर्णय लागतो याची चिंता सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे.

ठळक मुद्दे७ सप्टेंबरला होणार सुनावणी काही दिवसांसाठी लोकप्रतिनिधींना जीवदानजिल्हाधिकाºयांपुढे आलेल्या आक्षेपांवर त्यांनी आपली बाजू मांडली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी सध्या अपात्रतेच्या कात्रीत अडकले आहेत. निवडणूक खर्च सादर न करणे, अतिक्रमण करणे, शौचालय नसणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे अशा तांत्रिक बाबींचा ठपका ठेवल्याने त्यावर सध्या सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी सात सप्टेंबरला पूर्ण होणार असल्याने काय निर्णय लागतो याची चिंता सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे.या सर्व जनप्रतिनिधींच्या पात्रतेवर आक्षेप घेणाºया याचिकांवर सकाळी साडेदहा वाजतापासून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुनावणी केली. नॉनस्टॉप सुरू असलेल्या या सुनावणीसाठी अनेक सदस्य आपल्या वकिलांसह हजर झाले होते. जिल्हाधिकाºयांपुढे आलेल्या आक्षेपांवर त्यांनी आपली बाजू मांडली. त्याच्या नोंदी करून घेण्यात आल्या.ही सुनावणी सुरू असतानाच सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान भूसंपादनासंदर्भात नियोजित बैठक सुरू झाल्याने ही सुनावणी अर्ध्यावर थांबवून जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांची बैठक घेतली. मात्र बैठक संपायला सायंकाळचे सात वाजल्याने ही सुनावणी स्थगित करण्यात आली. पुढची सुनावणी ७ सप्टेंबरला होणार असून, त्याच दिवशी निकालही लागणार आहेत. प्रत्यक्षात या सर्व प्रकरणांवर आजच निर्णय होणार होता. मात्र प्रक्रिया लांबल्याने आणि सर्व प्रकरणांचा निपटारा पूर्ण न झाल्याने पुढची तारीख मिळाली आहे. त्यामुळे तूर्तास काही दिवसांसाठी तरी या लोकप्रतिनिधींना जीवदान मिळाले आहे.-----------------------३४ जि.प. सदस्यांचा समावेशच्जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. मात्र ३४ जिल्हा परिषद सदस्य आणि ७२ पंचायत समिती सदस्यांंंनी निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून निवडणूक खर्च सादरच केला नाही. त्यामुळे ही मंडळी आता अडचणीत आली आहेत. यासोबतच १२६ ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी शौचालय नसणे, अतिक्रमण करणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे, निवडणूक खर्च सादर न करणे तसेच अविश्वास प्रस्ताव दाखल होणे या कारणांमुळे अपात्रतेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.