शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सोलापूर जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी अपात्रतेच्या कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:34 IST

सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी सध्या अपात्रतेच्या कात्रीत अडकले आहेत. निवडणूक खर्च सादर न करणे, अतिक्रमण करणे, शौचालय नसणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे अशा तांत्रिक बाबींचा ठपका ठेवल्याने त्यावर सध्या सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी सात सप्टेंबरला पूर्ण होणार असल्याने काय निर्णय लागतो याची चिंता सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे.

ठळक मुद्दे७ सप्टेंबरला होणार सुनावणी काही दिवसांसाठी लोकप्रतिनिधींना जीवदानजिल्हाधिकाºयांपुढे आलेल्या आक्षेपांवर त्यांनी आपली बाजू मांडली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी सध्या अपात्रतेच्या कात्रीत अडकले आहेत. निवडणूक खर्च सादर न करणे, अतिक्रमण करणे, शौचालय नसणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे अशा तांत्रिक बाबींचा ठपका ठेवल्याने त्यावर सध्या सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी सात सप्टेंबरला पूर्ण होणार असल्याने काय निर्णय लागतो याची चिंता सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे.या सर्व जनप्रतिनिधींच्या पात्रतेवर आक्षेप घेणाºया याचिकांवर सकाळी साडेदहा वाजतापासून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुनावणी केली. नॉनस्टॉप सुरू असलेल्या या सुनावणीसाठी अनेक सदस्य आपल्या वकिलांसह हजर झाले होते. जिल्हाधिकाºयांपुढे आलेल्या आक्षेपांवर त्यांनी आपली बाजू मांडली. त्याच्या नोंदी करून घेण्यात आल्या.ही सुनावणी सुरू असतानाच सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान भूसंपादनासंदर्भात नियोजित बैठक सुरू झाल्याने ही सुनावणी अर्ध्यावर थांबवून जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांची बैठक घेतली. मात्र बैठक संपायला सायंकाळचे सात वाजल्याने ही सुनावणी स्थगित करण्यात आली. पुढची सुनावणी ७ सप्टेंबरला होणार असून, त्याच दिवशी निकालही लागणार आहेत. प्रत्यक्षात या सर्व प्रकरणांवर आजच निर्णय होणार होता. मात्र प्रक्रिया लांबल्याने आणि सर्व प्रकरणांचा निपटारा पूर्ण न झाल्याने पुढची तारीख मिळाली आहे. त्यामुळे तूर्तास काही दिवसांसाठी तरी या लोकप्रतिनिधींना जीवदान मिळाले आहे.-----------------------३४ जि.प. सदस्यांचा समावेशच्जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. मात्र ३४ जिल्हा परिषद सदस्य आणि ७२ पंचायत समिती सदस्यांंंनी निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून निवडणूक खर्च सादरच केला नाही. त्यामुळे ही मंडळी आता अडचणीत आली आहेत. यासोबतच १२६ ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी शौचालय नसणे, अतिक्रमण करणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे, निवडणूक खर्च सादर न करणे तसेच अविश्वास प्रस्ताव दाखल होणे या कारणांमुळे अपात्रतेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.