शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वारी मार्गावरील गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेचा विचार

By admin | Updated: July 2, 2016 12:51 IST

वारी मार्गावरील गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करुन सर्व गावांच्या पाणी पुरविण्यासाठी एकत्रित योजना करण्याचा विचार असून जिल्हा परषिदेने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

पंढरपूर - वारी मार्गावरील गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करुन सर्व गावांच्या पाणी पुरविण्यासाठी एकत्रित योजना करण्याचा विचार असून जिल्हा परषिदेने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या़.पंढरपूर आषाढी यात्रा, पाणीपुरवठा आणि स्वच्छ भारत मिशनबाबत शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार प्रशांत परिचारक आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले की, वारी मार्गावरील प्रत्येक गावात स्वच्छ पाणीपुरवठा केला जाण्यासाठी या सर्व गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करण्यात यावा. त्यानंतर या सर्व गावांच्या पाणीपुरवठ्याची एकत्रित जाळे केले जाईल. त्यामुळे वारी मार्गावरील गावात स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होईल.यंदाची वारी निर्मल वारी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज रहावे, पालखीचा मुक्काम ज्या गावात आहे त्या गावात पायाभूत सुविधा पुरवा. पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वीज पुरवठा आदी सुविधांची प्रत्यक्ष मुक्काच्या ठिकाणी जाऊन पहाणी करा अशा सूचनाही पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी दिल्या. मराठवाडा, विदर्भ येथून येणा-या पालख्यांसाठीही चोख व्यवस्था ठेवण्यात यावी अशा सूचना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.निर्मल वारी करण्यासाठी पालखीच्या मुक्कामाच्या गावात मोबईल टॉयलेट पुरविण्यात येणार आहे. या टॉयलेटचा वापर केला जावा यासाठी पालखी तळांच्या शजारील गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एनएसएसचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणुन काम करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी सांगितले. पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात ठेवण्यात येणा-या स्वच्छतेच्या आराखड्याची माहिती दिली. यात्रा काळात शहरात ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेटही उभारण्यात आली असल्याचे बापट यांनी सांगितले.बैठकीस सोमपा आयुक्त विजय काळम-पाटील, जि़प़चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे, पंढरपूर प्रांत संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, पंढरपूर तहसीलदार नागेश पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता सतीश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.